राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई : आम्हाला आमच्या मर्यादेची...शक्तीस्थळाची कल्पना आहे... तरीपण आमचे एक वेगळे अस्तित्व आहे ते घेऊन आम्ही यावेळेला मुंबई शहरात निवडणूकीला सामोरे जात असून आज मुंबईकरांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करत त्यामुळे तमाम मुंबईकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात, पायाभूत सुविधा आणि विकास- यावर भर देण्यात आला आहे, मुंबईतील रस्ते, पूल, आणि प्लायओव्हरचे आधुनिकीकरण करताना पाच वर्षांत ५०० किमी नवे रस्ते बांधणार आहे. जुन्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये मोफत पाणी पुरवठा केला जाईल.प्लास्टिक बंदी कडक करणे, सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या धोरणानुसार मोफत घरे आणि आरोग्य विमा योजनांचा लाभ दिला जाईल. प्रत्येक वॉर्डात प्रगत प्राथमिक आरोग्य केंद्र, मोफत वैद्यकीय तपासणी उभारणार,मनपा शाळांचे आधुनिकीकरण, डिजिटल क्लासरुम आणि मोफत पौष्टिक आहार योजना, स्मार्ट वर्गखोल्या आणि एआय तंत्रावर आधारीत शाळांचे व्यापक डिजीटलायझेशनवर भर, मुंबईला ग्रीन सिटी बनवताना १० लाख झाडे लावून उद्यानांचा विस्तार करणे, प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक बस आणि सीएनजी वाहनांना प्रोत्साहन, दिव्यांगासाठी मुंबई मेट्रोमध्ये पूर्ण सवलत तसेच विविध सुविधांसाठी पाठपुरावा करणार, दिव्यांग, लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच सुरक्षित चालता यावे यासाठी सर्वच पादचारी पथ (फुटपाथ) अतिक्रमणमुक्त राहतील यावर विशेष भर देणार,एक लाख नव्या घरांची निर्मिती आणि एसआरए योजनेचे वेगवान अंमलबजावणी, ७०० स्क्वेअर फुटांपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ,महिलांसाठी सुरक्षित मुंबई अभियान, सीसीटीव्ही हेल्पलाईन आणि पोलीस पेट्रोलिंग वाढवणे, वर्किंग वुमन होस्टलची प्रभावी उभारणी आदी मुद्यांचा जाहिरनाम्यात समावेश आहे. आम्हाला आमच्या मर्यादेची...शक्तीस्थळाची कल्पना आहे... तरीपण आमचे एक वेगळे अस्तित्व आहे ते घेऊन आम्ही यावेळेला मुंबई शहरात निवडणूकीला सामोरे जात असून आज मुंबईकरांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करत त्यामुळे तमाम मुंबईकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात, पायाभूत सुविधा आणि विकास- यावर भर देण्यात आला आहे, मुंबईतील रस्ते, पूल, आणि प्लायओव्हरचे आधुनिकीकरण करताना पाच वर्षांत ५०० किमी नवे रस्ते बांधणार आहे. जुन्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये मोफत पाणी पुरवठा केला जाईल.प्लास्टिक बंदी कडक करणे, सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या धोरणानुसार मोफत घरे आणि आरोग्य विमा योजनांचा लाभ दिला जाईल. प्रत्येक वॉर्डात प्रगत प्राथमिक आरोग्य केंद्र, मोफत वैद्यकीय तपासणी उभारणार,मनपा शाळांचे आधुनिकीकरण, डिजिटल क्लासरुम आणि मोफत पौष्टिक आहार योजना, स्मार्ट वर्गखोल्या आणि एआय तंत्रावर आधारीत शाळांचे व्यापक डिजीटलायझेशनवर भर, मुंबईला ग्रीन सिटी बनवताना १० लाख झाडे लावून उद्यानांचा विस्तार करणे, प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक बस आणि सीएनजी वाहनांना प्रोत्साहन, दिव्यांगासाठी मुंबई मेट्रोमध्ये पूर्ण सवलत तसेच विविध सुविधांसाठी पाठपुरावा करणार, दिव्यांग, लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच सुरक्षित चालता यावे यासाठी सर्वच पादचारी पथ (फुटपाथ) अतिक्रमणमुक्त राहतील यावर विशेष भर देणार,एक लाख नव्या घरांची निर्मिती आणि एसआरए योजनेचे वेगवान अंमलबजावणी, ७०० स्क्वेअर फुटांपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ,महिलांसाठी सुरक्षित मुंबई अभियान, सीसीटीव्ही हेल्पलाईन आणि पोलीस पेट्रोलिंग वाढवणे, वर्किंग वुमन होस्टलची प्रभावी उभारणी आदी मुद्यांचा जाहिरनाम्यात समावेश आहे.

Comments
Add Comment

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

- संशयित बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, सुगंधी द्रव्ये जप्त; अघोरी कृत्यांचा पोलिसांचा दावा मुंबई : उबाठा

Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण

Chandrashekhar Bawankule : दुबार पेरणीचा खर्च आता सरकार उचलणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती; 'डीपीडीसी'मधून खर्चाची तरतूद करणार मुंबई : पावसाने ओढ दिल्याने आणि

Ashish Shelar : दरवर्षी नाट्यगृहांच्या भाड्यात केवळ 1 ते 2 टक्के वाढ

• कोविडपूर्वीचाच मूळ दर आधारभूत मानणार • नाट्यसृष्टीच्या गोडाऊन व वाहनतळाच्या प्रश्नासाठी महिनाभरात

Navnath Ban : संजय राऊत, इतरांकडे पाहण्यापेक्षा अडगळीत पडलेल्या उबाठाकडे लक्ष द्या - नवनाथ बन

मुंबई : नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले "जनाब संजय राऊत

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणीसाठी शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार; बीएसएनएलसोबत समन्वय मुंबई, :