Maharashtra Weather :कोकणात थंडीच प्रमाण वाढल..तापमानाचा पारा घसरला मुंबईसह विदर्भ-मराठवाड्यातही जोरदार थंडी

रत्नागिरीत थंडीची लाट; दापोलीत मिनी महाबळेश्वरमध्ये पारा फक्त ७.४°C रत्नागिरी – उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. राज्यातील हवामानातील चढ-उतारामुळे कोकणासह विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईत तापमानात घट झाली आहे.राज्यभर जोरदार थंडीच वातावरण पहायला मिळत आहे.. कोकणात पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवत असून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहर परिसरात तापमान फक्त ७.४ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले आहे. या ठिकाणाला स्थानिक लोक “मिनी महाबळेश्वर” म्हणून ओळखतात.

मागील पाच ते सहा दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडी काहीशी कमी जाणवत होती, पण पुन्हा एकदा पारा घसरल्याने थंडीची झळ लागली आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे विदर्भ-मराठवाड्यात गारठा जाणवत असून मुंबईतही तापमानात घट झाली आहे.
थंडीमुळे कोकणातील बागायतदारांना काहीशी दिलासा मिळाला आहे. आंबा आणि काजू बागायतदारांसाठी थंड हवामान फायदेशीर ठरत असून दिवसभर सूर्यप्रकाशामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता कमी होते. मागील काही दिवस ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती, पण आता वातावरण सुधारल्याने बागायतदारांचा मनाचा बोजा हलका झाला आहे.

राज्यातील किनारपट्टी भागांमध्ये पावसाळी आणि दमट हवामान अनुभवायला मिळत असले तरी, थंडीच्या लाटेमुळे गारठ्याचा अनुभव राज्यभर वाढला आहे. हवामान तज्ज्ञांनी सांगितले की उत्तर भारतातील थंडीची लाट काही दिवस चालू राहणार असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे.
Comments
Add Comment

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव

मुंबई: राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे

Goregaon News : गोरेगावात शोभायात्रेदरम्यान दोन गट भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज, ८ जणांना अटक

मुंबई : काल गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये अचानक उसळलेल्या वादाने हिंसक

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा

लघु उद्योगांना भूखंड शुल्कात २० टक्के सवलत

'एमएसएमई' क्लस्टरला बळ; जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय मुंबई : आखाती देशातील

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका