Maharashtra Weather :कोकणात थंडीच प्रमाण वाढल..तापमानाचा पारा घसरला मुंबईसह विदर्भ-मराठवाड्यातही जोरदार थंडी

रत्नागिरीत थंडीची लाट; दापोलीत मिनी महाबळेश्वरमध्ये पारा फक्त ७.४°C रत्नागिरी – उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. राज्यातील हवामानातील चढ-उतारामुळे कोकणासह विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईत तापमानात घट झाली आहे.राज्यभर जोरदार थंडीच वातावरण पहायला मिळत आहे.. कोकणात पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवत असून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहर परिसरात तापमान फक्त ७.४ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले आहे. या ठिकाणाला स्थानिक लोक “मिनी महाबळेश्वर” म्हणून ओळखतात.

मागील पाच ते सहा दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडी काहीशी कमी जाणवत होती, पण पुन्हा एकदा पारा घसरल्याने थंडीची झळ लागली आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे विदर्भ-मराठवाड्यात गारठा जाणवत असून मुंबईतही तापमानात घट झाली आहे.
थंडीमुळे कोकणातील बागायतदारांना काहीशी दिलासा मिळाला आहे. आंबा आणि काजू बागायतदारांसाठी थंड हवामान फायदेशीर ठरत असून दिवसभर सूर्यप्रकाशामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता कमी होते. मागील काही दिवस ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती, पण आता वातावरण सुधारल्याने बागायतदारांचा मनाचा बोजा हलका झाला आहे.

राज्यातील किनारपट्टी भागांमध्ये पावसाळी आणि दमट हवामान अनुभवायला मिळत असले तरी, थंडीच्या लाटेमुळे गारठ्याचा अनुभव राज्यभर वाढला आहे. हवामान तज्ज्ञांनी सांगितले की उत्तर भारतातील थंडीची लाट काही दिवस चालू राहणार असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे.
Comments
Add Comment

मुंबई उच्च न्यायालयाचे यशस्वी न्यायदान; ७९ वर्ष जुना खटला निकाली

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्यानंतरचा म्हणजेच ७ ऑक्टोबर १९४७

एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे-कल्याणचा कायापालट: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे ‘मोबिलिटी हब’ तर कल्याण ‘प्रगत शहरी केंद्र’ म्हणून विकसित करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची

Shiv Jayanti 2026 : मुंबईत शिवजन्मोत्सवाचा शाही थाट! राज्यपाल आणि महापौरांच्या उपस्थितीत शिवरायांना अभिवादन

मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आज मुंबईत मोठ्या उत्साहात साजरी

Raj Thackeray Meet Eknath Shinde : माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला अन् आता भाऊही...; शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या भेटीगाठींचे सत्र जोरात असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी रात्री

राज्यात शुक्रवारपासून सुरू होणार दहावीची परीक्षा, १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (MSBSHSE) घेतली जाणारी दहावीची परीक्षा

Mumbai Metro: मुंबई मेट्रोसंदर्भातील मोठी अपडेट समोर; तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना...

मुंबई: मुंबई मेट्रोसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई मेट्रोमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक