बांगलादेशच्या मागणीला आयसीसीचा नकार

टी-२० विश्वचषकासाठी भारतात यावेच लागेल!


दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात होणारे बांगलादेशचे सामने सुरक्षा कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची बांगलादेश क्रिकेट बोर्डाची विनंती स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांदरम्यान आपल्या खेळाडूंच्या आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी हे सामने युएई किंवा श्रीलंकेसारख्या तटस्थ ठिकाणी हलवण्याची आयसीसीकडे मागणी केली होती.


मात्र, आयसीसीने बांगलादेशची ही विनंती अमान्य केली असून, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच सामने भारतात होतील, असे स्पष्ट केले आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने सुरक्षा किंवा इतर काही कारणांमुळे इंडियन प्रीमियर लीगमधून अचानक माघार घेतली होती. या पार्श्वभूमीवर आयसीसीच्या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. यामुळे बांगलादेशचे सामने नियोजित वेळापत्रकानुसार कोलकाता येथील ईडन गार्डन्स आणि मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत.


मात्र या सर्व परिस्थितीमुळे टी-२० विश्वचषकाच्या आयोजनात अनिश्चितता निर्माण झाली आहे. विश्वचषक सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना (स्पर्धा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे), आयसीसीच्या या भूमिकेमुळे बांगलादेशचा संघ भारतात खेळण्यास तयार होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हे आहे कारण : या वादाची मुळे आयपीएलशी जोडलेली आहेत. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांना बीसीसीआयच्या सूचनेनुसार संघातून मुक्त केले होते. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ भारतात मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ निर्माण झाला होता. यामुळे रहमानला आयपीएलमध्ये खेळवण्यास विरोध झाला आणि अखेर त्याला रिलीज करण्यात आले.


आयसीसीची भूमिका : रहमानच्या प्रकरणानंतर बांगलादेश सरकारनेही आक्रमक भूमिका घेत भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या बहिष्काराची धमकी दिली. बीसीबीने आयसीसीला पत्र लिहून भारतात सामने न खेळण्याची भूमिका मांडत ते श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली. खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बांगलादेशने आयपीएलचे आपल्या देशातील प्रसारणही थांबवले होते. मात्र आयसीसीने सर्व बाबींचा विचार करून ठाम भूमिका घेत बांगलादेशला भारतातच येऊन सामने खेळावे लागतील, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे बांगलादेशवर दबाव वाढला असून, विश्वचषकात सहभाग कायम ठेवण्यासाठी भारतात येण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Team India Schedule : विश्वचषकाच्या विजयानंतर पुढील कामगिरीसाठी भारतीय संघ सज्ज

- जाणून घ्या भारतीय संघाचे नवीन व्यस्त वेळापत्रक २०२६ चा आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकत भारतीय संघाने जागतिक

ICC Men's T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकामुळे आयसीसीची कोट्यवधींची कमाई

मुंबई : ICC Men's T20 World Cup २०२६ स्पर्धा केवळ क्रिकेटप्रेमींसाठीच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही मोठी ठरली आहे. या स्पर्धेतून

मॅच फिक्सिंग प्रकरणात ICC ची मोठी कारवाई; वेस्ट इंडिजचा खेळाडू आणि दोन संघ अधिकाऱ्यांवर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मॅच फिक्सिंग आणि गैरवर्तनाच्या आरोपांप्रकरणी कठोर कारवाई करत वेस्ट इंडिजचा

Kaviya Maran : पाकिस्तानी खेळाडूच्या खरेदीनंतर सनरायझर्स अडचणीत; X अकाउंट झाले सस्पेंड

मुंबई : काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं इंग्लंड येथे होणाऱ्या द हंड्रेड २०२६ च्या

सनरायजर्स लीड्सच्या काव्या मारनने पाकिस्तानच्या अबरार अहमदला संघात घेतल्याने समाज माध्यमावर संताप

मुंबई: काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं द हंड्रेड २०२६ च्या ऑक्शनमध्ये पाकिस्तान क्रिकेट

Rahul Dravid : बीसीसीआयकडून राहुल द्रविडचा सर्वोच्च सन्मान; शुभमन गिलचाही होणार विशेष सन्मान

- मुंबईचा आयुष म्हात्रे सर्वोत्तम ऑलराउंडर लाला अमरनाथ पुरस्काराने सन्मानित भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि