फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा! महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड, ब्रँड सांगणाऱ्यांचाच बँड वाजवू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्ष पण थेट शब्दांत निशाणा साधला आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात एकच ब्रँड होता आणि तो म्हणजे हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यानंतर महाराष्ट्रात कोणीही ब्रँड नाही.” तसेच, स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्यांचा आम्ही निवडणुकीत “बँड वाजवू”, असा इशाराही त्यांनी दिला. महायुतीमध्ये कोणीही स्वतःला ब्रँड समजून जनतेसमोर येत असेल, तर त्याचा राजकीय बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.


दरम्यान, भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले. “अजित पवार हे महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे आका आहेत,” असा आरोप करत,
“भ्रष्टाचार लपवण्यासाठीच ते भाजपसोबत आले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, “१५ तारखेनंतर जनता ठरवेल कोण काय आहे.”


आगामी काळात शिवतीर्थावर ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ऐतिहासिक सभा होणार असल्याचं चित्र आहे. तसेच, “उल्हासनगरमध्ये गुंडाराज चालणार नाही,” असा ठाम इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला

Comments
Add Comment

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये