नवी मुंबईकरांवर पाणीटंचाई! आज या भागात ७ तास राहणार पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई : नवी मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सिडकोकडून साई गावाजवळील मुख्य जलवाहिनीवर तातडीची दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आल्याने आज, बुधवार ७ जानेवारी रोजी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा तब्बल सात तास बंद ठेवण्यात येणार आहे. अचानक जाहीर झालेल्या या पाणीकपातीमुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.


सिडकोने दिलेल्या माहितीनुसार , सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत खारघर, तळोजा, उवा आणि द्रोणागिरी परिसरात नळ कोरडे राहणार आहेत. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पाणीपुरवठा सुरू होणार असला तरी सुरुवातीला कमी दाबाने आणि मर्यादित प्रमाणातच पाणी उपलब्ध होईल. सात तासांचा पाणीपुरवठा बंद असल्याने गृहिणी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच व्यावसायिकांची मोठी अडचण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


विशेष म्हणजे, नवी मुंबईकरांना गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा पाणीपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. १९ डिसेंबर रोजी वायल आणि ठोंबरेवाडी येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी कळंबोली, नवीन पनवेल आणि करंजाडे परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. वारंवार होणाऱ्या या तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, सिडकोच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


पाणीपुरवठा कधीही खंडित होणार याची पूर्वसूचना वेळेवर मिळत नसल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सातत्याने दुरुस्तीची कामे सुरू असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत?, असा सवाल आता नवी मुंबईकर विचारू लागले आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : "महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे पण ..."; महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडले स्पष्ट मत

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र

LPG Gas Price Hike : महागाईचा भडका! तब्बल ९९३ रुपयांनी महागला गॅस सिलेंडर; जाणून घ्या एका सिलेंडरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक

Madhya Pradesh Narmada cruise accident : बरगी धरणात क्रूझ बुडाले, ४ जणांचा मृत्यू,१०-१५ बेपत्ता

मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील बरगी धरण परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे एक मोठा अपघात घडला.

Maharashtra Din 2026 : ठाण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

ठाणे : महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे

HSC Results 2026 : बारावीचा निकाल काही तासांवर; जाणून घ्या निकाल कुठे आणि कसा पाहता येणार?

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा २०२६ चा निकाल उद्या म्हणजेच शनिवार २ मे रोजी जाहीर होणार

Weather Update : पुढील ४८ तास अतिशय महत्त्वाचे! उष्णतेतून दिलासा, पण अवकाळीचं नवं संकट दारात; IMDचा हाय अलर्ट

मुंबई : राज्यात सध्या उष्णतेचा कडाका शिगेला पोहोचला असून विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक