नवी मुंबईकरांवर पाणीटंचाई! आज या भागात ७ तास राहणार पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई : नवी मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सिडकोकडून साई गावाजवळील मुख्य जलवाहिनीवर तातडीची दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आल्याने आज, बुधवार ७ जानेवारी रोजी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा तब्बल सात तास बंद ठेवण्यात येणार आहे. अचानक जाहीर झालेल्या या पाणीकपातीमुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.


सिडकोने दिलेल्या माहितीनुसार , सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत खारघर, तळोजा, उवा आणि द्रोणागिरी परिसरात नळ कोरडे राहणार आहेत. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पाणीपुरवठा सुरू होणार असला तरी सुरुवातीला कमी दाबाने आणि मर्यादित प्रमाणातच पाणी उपलब्ध होईल. सात तासांचा पाणीपुरवठा बंद असल्याने गृहिणी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच व्यावसायिकांची मोठी अडचण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


विशेष म्हणजे, नवी मुंबईकरांना गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा पाणीपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. १९ डिसेंबर रोजी वायल आणि ठोंबरेवाडी येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी कळंबोली, नवीन पनवेल आणि करंजाडे परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. वारंवार होणाऱ्या या तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, सिडकोच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


पाणीपुरवठा कधीही खंडित होणार याची पूर्वसूचना वेळेवर मिळत नसल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सातत्याने दुरुस्तीची कामे सुरू असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत?, असा सवाल आता नवी मुंबईकर विचारू लागले आहेत.

Comments
Add Comment

PM Modi : पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान ताकाईची यांनी मारुती सुझुकी खरखोडा प्लांटचे केले उद्घाटन

नवी दिल्ली : भारतातील वाहन उद्योगात गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठी गुंतवणूक आता प्रत्यक्षात साकार झाली आहे.

India Japan relations : भारत-जपान दरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्यात आज महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही

Indian Navy : एडनच्या आखातात भारतीय नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांचा हल्ला हाणून पाडला

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा समुद्रातील आपली ताकद सिद्ध करत मोठ्या समुद्री चाचेगिरीचा प्रयत्न हाणून

Delhi Police : दिल्लीत मोठ्या हल्ल्याचा कट उधळला, आयएसआयशी संबंधित ४ दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : एका मोठ्या आंतरराज्यीय कारवाईत, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानची(Pakistan) गुप्तचर संस्था

Supreme Court : 'एआय विनाशकारी; मानवी हस्तक्षेप आवश्यक' - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत सावधगिरीचा

Indian Army : व्हेनेझुएलात भारतीय सैन्याची मानवतावादी कामगिरी; मलब्यातून ७९ वर्षीय महिलेला दिले जीवदान

नवी दिल्ली : व्हेनेझुएलामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर भारतीय सैन्याने मलब्याखाली अडकलेल्या ७९ वर्षीय