वार्षिक ३० लाखांपेक्षा अधिक कमावत्या करदात्यांच्या संख्येत २३.३४% वाढ

प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांपासून आलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या करदात्यात वाढ झाल्याचे आपण पाहिले होते. त्याआधारे आकडेवारीनुसार आता भारतातील चांगल्या पातळीवर असलेल्या पगारदार वर्गाची संख्या वेगाने वाढत आहे. वेगाने वाढत आहे. आकडेवारीनुसार वार्षिक ३० लाख रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्या अत्योच्च पगारदार करदात्यांचा वाटा आर्थिक वर्ष २०२४ मधील १८.४% २०२५ मध्ये २३.३४% पर्यंत वाढला आहे असे असे एका नवीन अहवालात बुधवारी म्हटले गेले आहे. क्लियरटॅक्सने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, हे मध्यम आणि उच्च-मध्यम वर्गामध्ये झालेली आर्थिक प्रगती सूचित करत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.हे निष्कर्ष क्लियरटॅक्सच्या 'हाऊ इंडिया फाइल्ड इन २०२५' या वार्षिक अहवालाचा भाग आहेत ज्यामध्ये भारतीय लोक कसे कमावतात, गुंतवणूक करतात आणि संपत्ती निर्माण करतात हे समजून घेण्यासाठी लाखो आयकर विवरणपत्रांचे विश्लेषण करण्यात आले.


उत्पन्नाची वाढलेली वर्षे स्पष्टपणे निष्कर्षात दिसून येतात. उपलब्ध माहितीनुसार,४०-५० वयोगटातील जवळपास ३८% पगारदार करदाते वार्षिक ३० लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतात, ज्यामुळे हा गट देशातील सर्वाधिक कमाई करणारा आणि कर-योगदान देणारा घटक बनला आहे. करिअरच्या मधल्या वर्षांमध्ये अनुभव आणि करिअरमधील स्थिरता अधिक पगारात कशी रूपांतरित होते याचे विस्तृत विवेचन या अहवालात करण्यात आले आहे. त्याच वेळी भारतीय लोक आपले उत्पन्न कसे मिळवतात यात एक मोठा बदल झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. करदाते आता केवळ पगारावर अवलंबून नाहीत. ITR-3 आणि ITR-2 दाखल करण्याच्या संख्येत झालेली मोठी वाढ दर्शवते की अधिक लोक व्यवसाय, व्यापार आणि गुंतवणुकीतून कमाई करत आहेत. त्यामुळे व्यवसायाकडे असलेला कलही या अहवालातून स्पष्ट करण्यात आला आहे.एकाच उत्पन्नाच्या करिअरपासून विविध उत्पन्न स्रोतांकडे होत असलेल्या बदलाचे संकेत आहे.


२५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आरटीआर दाखल करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि अनेक प्रथमच विवरणपत्र दाखल करणाऱ्यांनी आधीच भांडवली नफा नोंदवला आहे असा दावा अहवालाने केला. वय वर्ष २५ ते ३५ वयोगटातील मिलेनियल्स या बदलात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आण्टी एका निष्कर्षानुसार सक्रिय गुंतवणूक, व्यापार आणि अनेक उत्पन्न स्रोतांमुळे क्लिष्ट आयटीआर दाखल करणाऱ्यांमध्ये त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे हा भाग अर्थव्यवस्थेतील दृष्टीने महत्वाचा आहे. हा अहवाल असेही नमूद करतो की क्रिप्टो मालमत्ता ही मुख्य प्रवाहातील गुंतवणूक न राहता एक वाढलेल्या जोखमीची अतिरिक्त बाबही बाजारात अस्तित्वात आहे.


गुंतवणूक करणे ही आता एक विशेष कृती न राहता एक सामान्य आर्थिक सवय बनली आहे. ITR-3 दाखल करणाऱ्या बहुसंख्य करदात्यांनी भांडवली नफा नोंदवला आहे असे अहवालात म्हटले गेले आहे. त्यातूनच इक्विटी बाजार आणि व्यापार आता अनेक भारतीयांच्या नियमित आर्थिक नियोजनाचा भाग बनले आहेत. तरुण भारतीय गुंतवणूकदारांच्या मानसिकतेने कार्यक्षेत्रात मोठ्या संख्येने भाग घेत असल्याचेही अहवालात म्हटले गेले आहे.


Comments
Add Comment

Marijuana Cultivation : भांडुप जलाशय टेकडीवर गांजाची शेती, भाजप नगरसेविकेने आणली निदर्शनास

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप जलाशय टेकडी येथील डोंगराळ भागात काही समाजकंटकांनी बेकायदेशीररित्या गांजाची

BMC Staff : महानगरपालिका कर्मचारीच स्व-गणना सदिच्छादूत

मेट्रो, रेल्वे, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी स्व-गणना संदर्भात जनजागृती  मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आतापर्यंत

Water Cut : ग्रॅण्टरोड, गिरगांव भायखळा, महालक्ष्मी,वरळी आदी काही भागांमध्ये शुक्रवारीही पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य

BJP : शुक्रवारपासून भाजप नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर..

मुंबई अध्यक्ष, पालकमंत्री, नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील

SSC Result : कधी आहे दहावीचा निकाल ? आली मोठी अपडेट

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल

Kerala Congress Headquarters : पुरुष आमदाराकडून महिला आमदाराला बळजबरीने मिठी मारण्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर संताप

- केरळ काँग्रेस मुख्यालयातील धक्कादायक घटना केरळ : केरळ काँग्रेस मुख्यालयाच्या (Kerala Pradesh Congress Committee) तिरुवनंतपुरम