भटक्या श्वानांचे होणार सर्वेक्षण

अशी असणार शिक्षकांवर जबाबदारी


अलिबाग : आधीच अनेक अशैक्षणिक कामाचे ओझे असताना आता प्राथमिक शिक्षकांवर श्वान नियंत्रण कार्यक्रमाचा भाग म्हणून गावातील श्वान मोजण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांवर येऊन पडली आहे.


या निर्णयामुळे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या शुक्रवारी ९ जानेवारी रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, विभागांचे अधिकारी आणि प्रशासन यांच्यात चर्चा होणार आहे.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या निर्णयाविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्याचा निर्णय काही शिक्षक संघटनांनी घेतला आहे. श्वानदंशाचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करीत असतानाच ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, पशुसंवर्धन विभाग किंवा स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेला विरोध दर्शविण्यात येत आहे.


रायगड जिल्ह्यात दरवर्षी साधारणतः दोन हजारांहून अधिक नागरिकांना श्वानदंश होण्याच्या घटना घडत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मूळ अध्यापन कामांवर परिणाम श्वानगणनेमुळे शिक्षकांच्या होणार असल्याचा आक्षेप शिक्षक मूळ अध्यापन कार्यावर परिणाम संघटनांनी घेतला आहे.


आम्ही शिक्षक आहोत, श्वानगणक नव्हे, अशी भूमिका अनेक संघटनांनी निवडणुका, जनगणना, विविध मांडली आहे. शिक्षणाशिवाय सर्वेक्षणे आणि आता श्वानगणना अशा अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांवर ताण वाढत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.


ग्रामीण भागात साधारणतः प्रत्येक घरात एकतरी श्वान पाळलेला असतो. पाळीव आणि भटके श्वान यामधील फरक ओळखणे, प्रत्येक घरातील श्वानांची नोंद घेणे, तसेच गावात, वाड्या-वस्त्यांमध्ये व गल्ल्यांमध्ये मुक्तपणे भटकणाऱ्या कुत्र्यांवर नजर ठेवणे, ही जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे. या कामात मुख्याध्यापकांना नोडल अधिकारी, तर सर्व्हेक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचे सरकारी आदेश आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. श्वानगणनेची जबाबदारी थेट शिक्षकांवर टाकण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या