भटक्या श्वानांचे होणार सर्वेक्षण

अशी असणार शिक्षकांवर जबाबदारी


अलिबाग : आधीच अनेक अशैक्षणिक कामाचे ओझे असताना आता प्राथमिक शिक्षकांवर श्वान नियंत्रण कार्यक्रमाचा भाग म्हणून गावातील श्वान मोजण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांवर येऊन पडली आहे.


या निर्णयामुळे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या शुक्रवारी ९ जानेवारी रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, विभागांचे अधिकारी आणि प्रशासन यांच्यात चर्चा होणार आहे.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या निर्णयाविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्याचा निर्णय काही शिक्षक संघटनांनी घेतला आहे. श्वानदंशाचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करीत असतानाच ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, पशुसंवर्धन विभाग किंवा स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेला विरोध दर्शविण्यात येत आहे.


रायगड जिल्ह्यात दरवर्षी साधारणतः दोन हजारांहून अधिक नागरिकांना श्वानदंश होण्याच्या घटना घडत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मूळ अध्यापन कामांवर परिणाम श्वानगणनेमुळे शिक्षकांच्या होणार असल्याचा आक्षेप शिक्षक मूळ अध्यापन कार्यावर परिणाम संघटनांनी घेतला आहे.


आम्ही शिक्षक आहोत, श्वानगणक नव्हे, अशी भूमिका अनेक संघटनांनी निवडणुका, जनगणना, विविध मांडली आहे. शिक्षणाशिवाय सर्वेक्षणे आणि आता श्वानगणना अशा अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांवर ताण वाढत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.


ग्रामीण भागात साधारणतः प्रत्येक घरात एकतरी श्वान पाळलेला असतो. पाळीव आणि भटके श्वान यामधील फरक ओळखणे, प्रत्येक घरातील श्वानांची नोंद घेणे, तसेच गावात, वाड्या-वस्त्यांमध्ये व गल्ल्यांमध्ये मुक्तपणे भटकणाऱ्या कुत्र्यांवर नजर ठेवणे, ही जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे. या कामात मुख्याध्यापकांना नोडल अधिकारी, तर सर्व्हेक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचे सरकारी आदेश आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. श्वानगणनेची जबाबदारी थेट शिक्षकांवर टाकण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित