Pune Crime News : आधी अपहरण, मग हत्या अन् थेट...पुण्यातील १७ वर्षांच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, भयानक प्रकार उघड

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाचा वापर करून एका १७ वर्षीय मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. अमनसिंग सुरेंद्रसिंह गच्चड (वय १७, रा. विश्रांतवाडी) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.



इन्स्टाग्रामवर रचला मृत्यूचा सापळा


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी अमनसिंगला जाळ्यात ओढण्यासाठी इन्स्टाग्रामचा आधार घेतला. एका मुलीच्या बनावट किंवा ओळखीच्या अकाऊंटवरून अमनसिंगला मेसेज करण्यात आले आणि त्याला कात्रज परिसरात भेटण्यासाठी बोलावण्यात आले. आपण एका मुलीला भेटायला जात आहोत या समजुतीने अमनसिंग तिथे पोहोचला, मात्र तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याचे अपहरण केले. आरोपींनी अमनसिंगला कात्रजवरून जबरदस्तीने खेड शिवापूर परिसरात नेले. तिथे निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर दगड आणि कोयत्याने सपासप वार करण्यात आले. हा हल्ला इतका भीषण होता की अमनसिंगचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला, मात्र पुणे पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवत या प्रकरणाचा छडा लावला.



पोलिसांची मोठी कारवाई


या भीषण हत्याकांडात सहभागी असलेल्या प्रथमेश चिंधू आढळ (वय १९, रा. उत्तमनगर) आणि नागेश बालाजी धबाले (वय १९, रा. शिवणे) या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या दोन विधिसंघर्षित (अल्पवयीन) मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक माहितीनुसार वैयक्तिक वाद किंवा पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.



जुने भांडण आणि 'हनी ट्रॅप'चा बनाव


मिळालेल्या माहितीनुसार, २९ डिसेंबर रोजी अमनसिंग आपली गाडी घेऊन घरातून बाहेर पडला होता. मात्र, रात्र झाली तरी तो परतला नाही. दोन दिवस त्याचा शोध घेतल्यानंतर, अखेर त्याच्या आईने ३१ डिसेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मुलाचे वय कमी असल्याने आणि परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. विश्रांतवाडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने अमनसिंगच्या मोबाईलचा सीडीआर (Call Detail Record) आणि तांत्रिक लोकेशन तपासले. तपासात असे समोर आले की, अमनसिंगला शेवटचे कात्रज आणि त्यानंतर उत्तमनगर परिसरात पाहिले गेले होते. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीनुसार तपास केला असता, जुन्या भांडणातून प्रथमेश आढळ, नागेश धबाले आणि त्यांच्या अल्पवयीन मित्रांनी अमनसिंगचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. अमनसिंगची हत्या केल्यानंतर आरोपींनी राज्याबाहेर पळ काढला होता. ते कर्नाटकातील बेळगावमध्ये लपून बसल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ बेळगावात जाऊन सापळा रचला आणि प्रथमेश आढळ व नागेश धबाले या दोन प्रमुख आरोपींसह त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी एका मुलीच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर अमनसिंगशी संपर्क साधला आणि त्याला कात्रज येथे भेटण्यासाठी बोलावले. तिथून त्याचे अपहरण करून त्याला खेड शिवापूर येथील निर्जन स्थळी नेले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिथे त्याच्यावर दगड आणि कोयत्याने सपासप वार करून त्याला संपवले.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू