जळगावात महायुतीचे शक्ती प्रदर्शन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रॅलीला प्रचंड गर्दी


जळगाव : जळगाव शहरात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महापालिका प्रचारार्थ आयोजित रोड शोला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने महायुतीने शहरात शक्ती प्रदर्शन केले. सायंकाळी महापालिका निवडणुक प्रचारार्थ मुख्यमंत्री यांचे धुळयाहून आगमन जळगाव शहरात झाले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची भाजपाने जोरदार तयारी केली. जिल्हाभरातून पदाधिकारी, निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक शहरात भाजपा कार्यालयात दाखल झाले, रोड शोमध्ये दोन रथांचे आयोजन करण्यात आले. त्यात एका रथात सर्व निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक तर, दुसऱ्या रथात मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील,संजय सावकारे, गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, अमोल जावळे, चंद्रकांत सोनवणे, अमोल पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी होते. या रोड शोमध्ये दहा हजारांवर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले असल्याचा दावा केला आहे.


जळगाव शहराच्या विकासासाठी मदत करणार


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना काँग्रेसच्या काळात शहर विकासासाठी ५० कोटी देखील मिळाले नव्हते असे सांगून जळगाव शहराच्या विकासासाठी आम्ही हजार कोटी दिले. आतापर्यंत ८६३ कोटींची विकासकामे दिली. यापुढे शहराच्या विकासासाठी पैसा देत राहू असे आश्वासन दिले. त्याचबरोबर पुढील पाच वर्षांत जळगाव स्मार्ट सिटी करण्याचा संकेत दिला. जळगावात उदयोग यावेत म्हणून जळगाव एमआयडीसीला डी दर्जा देण्यात आला आहे, यामुळे येथे सबसिडी मिळत असल्याने शहरात आता नवे उद्योग येतील, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील