जळगावात महायुतीचे शक्ती प्रदर्शन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रॅलीला प्रचंड गर्दी


जळगाव : जळगाव शहरात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महापालिका प्रचारार्थ आयोजित रोड शोला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने महायुतीने शहरात शक्ती प्रदर्शन केले. सायंकाळी महापालिका निवडणुक प्रचारार्थ मुख्यमंत्री यांचे धुळयाहून आगमन जळगाव शहरात झाले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची भाजपाने जोरदार तयारी केली. जिल्हाभरातून पदाधिकारी, निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक शहरात भाजपा कार्यालयात दाखल झाले, रोड शोमध्ये दोन रथांचे आयोजन करण्यात आले. त्यात एका रथात सर्व निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक तर, दुसऱ्या रथात मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील,संजय सावकारे, गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, अमोल जावळे, चंद्रकांत सोनवणे, अमोल पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी होते. या रोड शोमध्ये दहा हजारांवर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले असल्याचा दावा केला आहे.


जळगाव शहराच्या विकासासाठी मदत करणार


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना काँग्रेसच्या काळात शहर विकासासाठी ५० कोटी देखील मिळाले नव्हते असे सांगून जळगाव शहराच्या विकासासाठी आम्ही हजार कोटी दिले. आतापर्यंत ८६३ कोटींची विकासकामे दिली. यापुढे शहराच्या विकासासाठी पैसा देत राहू असे आश्वासन दिले. त्याचबरोबर पुढील पाच वर्षांत जळगाव स्मार्ट सिटी करण्याचा संकेत दिला. जळगावात उदयोग यावेत म्हणून जळगाव एमआयडीसीला डी दर्जा देण्यात आला आहे, यामुळे येथे सबसिडी मिळत असल्याने शहरात आता नवे उद्योग येतील, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे