अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती

बहुमतासाठी अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचा 'गेम' करण्याची रणनिती


अंबरनाथ : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याच्या राजकारणात आज सर्वांत मोठी रणनिती उघडकीस आली आहे. राज्यात महायुती असली तरी ठाणे जिल्ह्यात भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) मोठा धक्का दिला आहे. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना (शिंदे गट) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत युती केली. या खेळीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना २३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुळे विजयी झाल्या. निवडणुकीत भाजपला १६ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४ नगरसेवक मिळून ३२ सदस्यांची मोट तयार झाली असून, भाजप बहुमत मिळवणार आहे.


अंबरनाथ नगर परिषद निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील बालेकिल्ला मानली जात होती. अनेक वर्षांपासून सत्ता राखणाऱ्या शिवसेनेला (शिंदे गट) भाजपच्या युतीने मोठा झटका दिला आहे. तेजश्री करंजुळे यांच्या यशामुळे शिवसेनेची (शिंदे गट) प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. या युतीने अंबरनाथमधील राजकीय समीकरण पूर्ण बदलले असून, भविष्यातील नगर परिषद राजकारणासाठी ही महत्त्वाची वळणबिंदू ठरणार आहे. भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजुळे-पाटील यांनी असा दावा केला की, ''युतीसाठी शिवसेनेकडून प्रतिसाद मिळालेला नव्हता. निवडणुकीत अंबरनाथ नगर परिषदेची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे होती. ही नगर परिषद कल्याण लोकसभा मतदारसंघात येते, त्यामुळे भाजप-काँग्रेसची युती शिंदे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानली जात आहे.'' या युतीमुळे अंबरनाथमधील राजकीय समीकरण पूर्ण बदलले असून, भविष्यातील नगर परिषदेतील सत्ता विभाजनासाठी हा निर्णय निर्णायक ठरणार आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : 'कच्छी समाजाशी नातं हे कुटुंबासारखंच'; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)

Thane Crime : निर्दयीपणाचा कळस; साडेतीन वर्षांच्या मुलाला गरम उलथण्याने दिले चटके

Thane News : ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी कासारवडवलीत वाहतूक बदल; ६ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत मार्ग बंद

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या