अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती

बहुमतासाठी अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचा 'गेम' करण्याची रणनिती


अंबरनाथ : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याच्या राजकारणात आज सर्वांत मोठी रणनिती उघडकीस आली आहे. राज्यात महायुती असली तरी ठाणे जिल्ह्यात भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) मोठा धक्का दिला आहे. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना (शिंदे गट) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत युती केली. या खेळीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना २३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुळे विजयी झाल्या. निवडणुकीत भाजपला १६ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४ नगरसेवक मिळून ३२ सदस्यांची मोट तयार झाली असून, भाजप बहुमत मिळवणार आहे.


अंबरनाथ नगर परिषद निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील बालेकिल्ला मानली जात होती. अनेक वर्षांपासून सत्ता राखणाऱ्या शिवसेनेला (शिंदे गट) भाजपच्या युतीने मोठा झटका दिला आहे. तेजश्री करंजुळे यांच्या यशामुळे शिवसेनेची (शिंदे गट) प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. या युतीने अंबरनाथमधील राजकीय समीकरण पूर्ण बदलले असून, भविष्यातील नगर परिषद राजकारणासाठी ही महत्त्वाची वळणबिंदू ठरणार आहे. भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजुळे-पाटील यांनी असा दावा केला की, ''युतीसाठी शिवसेनेकडून प्रतिसाद मिळालेला नव्हता. निवडणुकीत अंबरनाथ नगर परिषदेची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे होती. ही नगर परिषद कल्याण लोकसभा मतदारसंघात येते, त्यामुळे भाजप-काँग्रेसची युती शिंदे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानली जात आहे.'' या युतीमुळे अंबरनाथमधील राजकीय समीकरण पूर्ण बदलले असून, भविष्यातील नगर परिषदेतील सत्ता विभाजनासाठी हा निर्णय निर्णायक ठरणार आहे.

Comments
Add Comment

Dombivli Shardul Vichare : डोंबिवलीच्या शार्दुलने CA इंटरमीडिएटमध्ये देशात पटकावला पहिला क्रमांक

डोंबिवली : डोंबिवलीतून अभिमानाची बातमी समोर आली आहे. डोंबिवलीच्या शार्दुल शेखर विचारे याने इन्स्टिट्यूट ऑफ

Badlapur Accident : भरधाव BMW रस्त्यावर पलटली; भीषण अपघातात दोन जण ठार

बदलापूर : बदलापूर (Badlapur) परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Accident) दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाला असून

Ulhasnagar Lizard In Manchurian : उल्हासनगरात धक्कादायक प्रकार! मंचुरियनमध्ये पालीचे पिल्लू

मुंबई : अन्नसुरक्षेचा (Food Safety) गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये एका चायनीज सेंटरमधून (Chinese Centre)

Ambernath News: डॉक्टर पतीचा 'तो' त्रास असाह्य; लग्नाच्या दीड महिन्यात नवविवाहितेची आत्महत्या

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath) एका २६ वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)

Yamdut Campaign : दिवा स्थानकात रेल्वे पोलिसांची अनोखी ‘यमदूत’ मोहीम; रुळ ओलांडणाऱ्यांचे प्रबोधन

ठाणे: रेल्वे रुळ ओलांडण्याच्या धोकादायक सवयीला आळा घालण्यासाठी आणि वाढते रेल्वे अपघात रोखण्यासाठी ठाणे रेल्वे

Thane News: 4 वर्षीय चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे वाचले बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण; ठाणे वाहतूक पोलिसांची तत्पर कारवाई

ठाणे : चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे एका बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण