Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील विरार (पूर्व), आचोळे गालानगर, विजय नगर, फुलपाडा, कारगिल नगर, कोकण नगर या परिसरातील भाजपा-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली व चौकसभा पार पडल्या.


यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केवळ मतदानाचे आवाहन नाही, तर मोठ्या संख्येने या भागात स्थायिक असलेल्या कोकणवासीयांच्या आशा, अपेक्षा आणि भविष्यासाठीचा निर्धार व्यक्त केला. वसई-विरार शहरातील नागरिकांचे गेली कित्येक वर्ष घरांचे प्रश्न आणि पाण्यासारख्या मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.



वसई-विरार महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवून हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्याचा निर्धार आहे. भाजपा-महायुती म्हणजे विकासाचे वचन असून, हे वचन पूर्ण करण्यासाठी जनतेने भाजपा-महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन यावेळी केले. यावेळी नालासोपारा विधानसभेचे आमदार श्री.राजन नाईक, नगरसेवक पदाचे उमेदवार आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Dialysis facility : पश्चिम उनगरातील ३ आणि पूर्व उपनगरातील २ रुग्णालयात डायलेसिसची सुविधा

मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील उपनगरीय रुग्णालयांमध्ये डायलेसीस केंद्र सुरु करण्यात येत असून

Mumbai : मुंबई महापालिकेच्यावतीने विद्यार्थीनींसाठी कांदिवलीत वसतीगृह

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने गोरेगाव येथे नोकरदार महिलांसाठी वसतीगृह सुरु करण्यात

Education : 'महापालिकेचे शालेय भूखंड खासगी संस्थांना देऊच नका'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमांतून शाळांच्या मोकळ्या जागा या खासगी

SIR साठी राजकीय पक्षांनीही स्थानिक भागांत मतदान केंद्रस्तरीय सहायकांची नेमणूक करा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशांनुसार, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदार

BMC अतिरिक्त आयुक्तांनी दिली ॲक्वर्थ रुग्णालयाला अचानक भेट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे दीर्घकाळ उपचार घेणाऱ्या वयोवृद्ध

Atul Save : भटके-विमुक्त समाजाच्या समस्या निवारणासाठी त्रिस्तरीय समित्या

मुंबई : राज्यातील भटके-विमुक्त समाजाच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे