नवी मुंबईत महाविकास आघाडीत गडबड ?

शिवसेना-मनसेची एकी; राष्ट्रवादीचा रुसवा


ठाणे : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत काहीही आलबेल नाही. मविआमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उबाठा आणि मनसे एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एका बाजूला दुर्लक्षित झाला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमले म्हणाले, "आमच्याकडून कोणत्याही स्वरूपाची बिघाडी झालेली नाही. शिवसेना-उबाठा गट आणि मनसे युतीबाबतची घोषणा आम्हाला नुकतीच कळली. जागा वाटपातही आमच्या विश्वासात घेतले गेले नाही, ही बाब गंभीर आहे."


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना-उबाठा गट आणि मनसे एकत्र येण्याने महाविकास आघाडीसाठी हा एक नवा धक्का आहे. आमले यांच्या मते, स्थानिक कार्यकर्त्यांना हा निर्णय रुचलेला नाही, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन कमी झाले आहे. "नैसर्गिक महाविकास आघाडी ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना-उबाठा गट आणि काँग्रेस यांची आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला," असे आमले यांनी स्पष्ट केले.


शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी मनसेबरोबर चर्चा करून जागा वाटपाचे फॉर्म्युला निश्चित केले. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासह बैठक घेतली. आमले यांनी सांगितले की, बिघाडी मनसेमुळे झाली की अन्य कारणामुळे, हे पक्षालाच ठाऊक आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट वाटप करत समाजातील विविध घटकांना प्राधान्य दिले असून, स्थानिक भूमिपुत्र, पश्चिम महाराष्ट्र माथाडी कामगार, मुस्लिम समाज आणि दलित समाज यांना उमेदवारी मिळाली आहे. आमले यांनी सांगितले की, "सर्व समावेशक उमेदवारीमुळे लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसेल."

Comments
Add Comment

Mira Road Accident : मिरा रोडमध्ये बांधकाम साईटवर मोठा अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन थेट खाली, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : मिरा रोड (Mira Road) येथील जेपी नॉर्थ (JP North) कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सायंकाळी बांधकाम साईटवर (Construction Site) भीषण

Eknath Shinde : 'कच्छी समाजाशी नातं हे कुटुंबासारखंच'; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)

Thane Crime : निर्दयीपणाचा कळस; साडेतीन वर्षांच्या मुलाला गरम उलथण्याने दिले चटके