Nitesh Rane : "उद्धव ठाकरे नाही, तर ते 'उद्धव वाकरे'...नितेश राणेंचा घणाघात!

अमित साटम यांच्या आडनावावरून केलेल्या विधानामुळे राणे आक्रमक


मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या आडनावावरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी या वादात उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला असून, त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. "ज्यांनी जिहादी मानसिकतेसमोर गुडघे टेकले आहेत, अशांचा कणा आता मोडला असून ते 'ठाकरे' राहिले नसून 'वाकरे' झाले आहेत," अशा शब्दांत राणेंनी प्रहार केला आहे.



कोकणी अस्मितेचा अवमान खपवून घेणार नाही!




उद्धव ठाकरेंनी अमित साटम यांच्या आडनावावर केलेल्या टिप्पणीचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले की, "नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आपल्या अहंकारातून एका प्रामाणिक लोकप्रतिनिधीच्या आडनावाची थट्टा उडवली आहे. कोकणामध्ये साटम, परब, सावंत, राणे अशी आडनावे मोठ्या स्वाभिमानाने लावली जातात. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आडनावाचा अपमान करता, तेव्हा तुम्ही केवळ त्या व्यक्तीला नाही, तर संपूर्ण कोकणच्या मातीला आणि तिथल्या संस्कृतीला आव्हान देता. ही कोकणी अस्मिता आहे, जी अशा प्रकारचा अपमान कधीही सहन करणार नाही."



'उद्धव वाकरे' शब्दाचा वापर करत टोकदार टीका


यावेळी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख सातत्याने 'उद्धव वाकरे' असा केला. "उद्धव ठाकरेंना आता सत्तेसाठी वाकण्याची सवय झाली आहे. हिंदुत्वाचा विचार सोडून ज्यांनी अल्पसंख्याकांच्या मतांसाठी तडजोड केली, त्यांचा कणा आता ताठ राहिला नाही. त्यामुळे ते आता 'वाकरे' झाले आहेत. आमच्या कोकणी माणसाच्या आडनावांची खिल्ली उडवणाऱ्या या वृत्तीला आता कोकणचा वचक आणि हिसका काय असतो, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे," असे राणे यांनी ठणकावून सांगितले.



मतपेटीतून 'हिशोब' चुकता करण्याचा इशारा


मुंबईत राहणाऱ्या कोकणी बांधवांना आवाहन करताना नितेश राणे म्हणाले की, "हा अपमान विसरू नका. मुंबईच्या विकासामध्ये आणि कोकणच्या जडणघडणीत साटम आणि इतर कोकणी कुटुंबांचे मोठे योगदान आहे. अमित साटम यांच्या पाठीशी संपूर्ण कोकणी जनता खंबीरपणे उभी आहे. या अपमानाचा बदला आता मतपेटीतून घेतला जाईल. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंना कोकणची जनता त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही."

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात