Nitesh Rane : "उद्धव ठाकरे नाही, तर ते 'उद्धव वाकरे'...नितेश राणेंचा घणाघात!

अमित साटम यांच्या आडनावावरून केलेल्या विधानामुळे राणे आक्रमक


मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या आडनावावरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी या वादात उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला असून, त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. "ज्यांनी जिहादी मानसिकतेसमोर गुडघे टेकले आहेत, अशांचा कणा आता मोडला असून ते 'ठाकरे' राहिले नसून 'वाकरे' झाले आहेत," अशा शब्दांत राणेंनी प्रहार केला आहे.



कोकणी अस्मितेचा अवमान खपवून घेणार नाही!




उद्धव ठाकरेंनी अमित साटम यांच्या आडनावावर केलेल्या टिप्पणीचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले की, "नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आपल्या अहंकारातून एका प्रामाणिक लोकप्रतिनिधीच्या आडनावाची थट्टा उडवली आहे. कोकणामध्ये साटम, परब, सावंत, राणे अशी आडनावे मोठ्या स्वाभिमानाने लावली जातात. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आडनावाचा अपमान करता, तेव्हा तुम्ही केवळ त्या व्यक्तीला नाही, तर संपूर्ण कोकणच्या मातीला आणि तिथल्या संस्कृतीला आव्हान देता. ही कोकणी अस्मिता आहे, जी अशा प्रकारचा अपमान कधीही सहन करणार नाही."



'उद्धव वाकरे' शब्दाचा वापर करत टोकदार टीका


यावेळी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख सातत्याने 'उद्धव वाकरे' असा केला. "उद्धव ठाकरेंना आता सत्तेसाठी वाकण्याची सवय झाली आहे. हिंदुत्वाचा विचार सोडून ज्यांनी अल्पसंख्याकांच्या मतांसाठी तडजोड केली, त्यांचा कणा आता ताठ राहिला नाही. त्यामुळे ते आता 'वाकरे' झाले आहेत. आमच्या कोकणी माणसाच्या आडनावांची खिल्ली उडवणाऱ्या या वृत्तीला आता कोकणचा वचक आणि हिसका काय असतो, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे," असे राणे यांनी ठणकावून सांगितले.



मतपेटीतून 'हिशोब' चुकता करण्याचा इशारा


मुंबईत राहणाऱ्या कोकणी बांधवांना आवाहन करताना नितेश राणे म्हणाले की, "हा अपमान विसरू नका. मुंबईच्या विकासामध्ये आणि कोकणच्या जडणघडणीत साटम आणि इतर कोकणी कुटुंबांचे मोठे योगदान आहे. अमित साटम यांच्या पाठीशी संपूर्ण कोकणी जनता खंबीरपणे उभी आहे. या अपमानाचा बदला आता मतपेटीतून घेतला जाईल. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंना कोकणची जनता त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही."

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे