Nitesh Rane : "उद्धव ठाकरे नाही, तर ते 'उद्धव वाकरे'...नितेश राणेंचा घणाघात!

अमित साटम यांच्या आडनावावरून केलेल्या विधानामुळे राणे आक्रमक


मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या आडनावावरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी या वादात उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला असून, त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. "ज्यांनी जिहादी मानसिकतेसमोर गुडघे टेकले आहेत, अशांचा कणा आता मोडला असून ते 'ठाकरे' राहिले नसून 'वाकरे' झाले आहेत," अशा शब्दांत राणेंनी प्रहार केला आहे.



कोकणी अस्मितेचा अवमान खपवून घेणार नाही!




उद्धव ठाकरेंनी अमित साटम यांच्या आडनावावर केलेल्या टिप्पणीचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले की, "नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आपल्या अहंकारातून एका प्रामाणिक लोकप्रतिनिधीच्या आडनावाची थट्टा उडवली आहे. कोकणामध्ये साटम, परब, सावंत, राणे अशी आडनावे मोठ्या स्वाभिमानाने लावली जातात. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आडनावाचा अपमान करता, तेव्हा तुम्ही केवळ त्या व्यक्तीला नाही, तर संपूर्ण कोकणच्या मातीला आणि तिथल्या संस्कृतीला आव्हान देता. ही कोकणी अस्मिता आहे, जी अशा प्रकारचा अपमान कधीही सहन करणार नाही."



'उद्धव वाकरे' शब्दाचा वापर करत टोकदार टीका


यावेळी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख सातत्याने 'उद्धव वाकरे' असा केला. "उद्धव ठाकरेंना आता सत्तेसाठी वाकण्याची सवय झाली आहे. हिंदुत्वाचा विचार सोडून ज्यांनी अल्पसंख्याकांच्या मतांसाठी तडजोड केली, त्यांचा कणा आता ताठ राहिला नाही. त्यामुळे ते आता 'वाकरे' झाले आहेत. आमच्या कोकणी माणसाच्या आडनावांची खिल्ली उडवणाऱ्या या वृत्तीला आता कोकणचा वचक आणि हिसका काय असतो, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे," असे राणे यांनी ठणकावून सांगितले.



मतपेटीतून 'हिशोब' चुकता करण्याचा इशारा


मुंबईत राहणाऱ्या कोकणी बांधवांना आवाहन करताना नितेश राणे म्हणाले की, "हा अपमान विसरू नका. मुंबईच्या विकासामध्ये आणि कोकणच्या जडणघडणीत साटम आणि इतर कोकणी कुटुंबांचे मोठे योगदान आहे. अमित साटम यांच्या पाठीशी संपूर्ण कोकणी जनता खंबीरपणे उभी आहे. या अपमानाचा बदला आता मतपेटीतून घेतला जाईल. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंना कोकणची जनता त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही."

Comments
Add Comment

आयएसएफ २०२५ अंतर्गत ‘वन इनोव्हेशन’ राष्ट्रीय स्पर्धेत अरजित मोरे विजेता

मुंबई  : महाराष्ट्रातील इयत्ता ८ वी चा विद्यार्थी अरजित अमोल मोरे यांची ‘वन इनोव्हेशन – टुवर्ड्स अ सेल्फ रिलायंट

जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी

देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सीमेवर जाऊन सांस्कृतिक 'सलामी ' मुंबई  : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमेवर तैनात

मुंबईतील ९ विधानसभांमध्ये उबाठाचे 'शून्य' नगरसेवक

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा उबाठा ठरला असला तरी प्रत्यक्षात मुंबईतील ०९

विद्याविहार रेल्वे पूल येत्या ३१ मे २०२६ पर्यंत होणार पूर्ण, पूर्व दिशेकडील कामे २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील पूर्व व पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील

सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध, फेसबुक-एक्सवर पोस्ट कर्मचाऱ्यांना महागात पडणार

मुंबई : राज्य शासनाचे कर्मचारी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर गणवेशातील फोटो, कार्यालयाचे लोगो, पदनाम,

कोकणातील कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत होणार!

सीमांकनासाठी समिती गठीत; तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : कोकण किनारपट्टीवरील