मनसेचे नाराज संतोष धुरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला - मंत्री नितेश राणे यांनी घडवून आणली भेट

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसे मोठा धक्का बसला आहे. मनसेचे कट्टर नेते आणि वरळी विभागातील प्रमुख कार्यकर्ते संतोष धुरी यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंत्री नितेश राणे यांनी ही भेट घडवून आणली. प्रभाग क्रमांक १९४ मधून तिकीट न मिळाल्याने धुरी गेल्या काही दिवसांपासून नाराज होते.


प्रभाग क्रमांक १९२ आणि १९४ या दोन जागांवर उबाठा आणि मनसेत तिढा होता. अखेर या वादावर तोडगा काढत प्रभाग १९२ मनसेकडे राहिला, तर प्रभाग १९४ उबाठाला सोडण्यात आला. मात्र, प्रभाग क्रमांक १९४ मधून माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांचा या क्षेत्रात दीर्घकाळ सक्रिय सहभाग आणि प्रभाव होता. परंतु जागावाटपात हा प्रभाग उबाठाला गेल्याने संतोष धुरी यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली. या निर्णयानंतर संतोष धुरी काही काळ नॉट रिचेबल झाले होते.

Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक