काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर न्यायालयाची दखल; बजरंग दल प्रकरणी पोलिस तपास सुरू

मुंबई : काँग्रेसने २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात बजरंग दलवर बंदी घालण्याचं आश्वासन दिलं होतं. या जाहीरनाम्याच्या माध्यमातून हिंदुत्ववादी संघटनेची बदनामी केल्याचा आरोप करत बजरंग दलाकडून न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


या तक्रारीची दखल घेत सोमवारी ५ जानेवारी रोजी दंडाधिकारी न्यायालयाने भांडुप पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या चौकशीचा सविस्तर अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.



नेमकं प्रकरण काय आहे?


कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलची तुलना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या प्रतिबंधित संघटनेशी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तुलनेमुळे संघटनेची प्रतिमा मलिन झाली असल्याचं बजरंग दलाचं म्हणणं आहे. या प्रकरणी मुंबईतील एका बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने वकील संतोष दुबे यांच्यामार्फत दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.


या तक्रारीवर सोमवारी माझगाव येथील न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली. तक्रारीत काँग्रेस पक्षासह राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.



तक्रारदाराचा आरोप काय?


तक्रारदाराच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायद्यानुसार कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारलाच आहे. त्यामुळे काँग्रेसने जाहीरनाम्यात बजरंग दलवर बंदी घालण्याचं दिलेलं आश्वासन दिशाभूल करणारे आणि बदनामीकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या विधानामुळे बजरंग दल आणि त्याच्या कार्यकर्त्यांची सामाजिक प्रतिमा आणि प्रतिष्ठा धोक्यात आल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या युक्तिवादाची दखल घेत न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अंतर्गत भांडुप पोलिसांना प्राथमिक चौकशीचे आदेश दिले असून, १७ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

Diet Tips : Weight Loss साठी तांदूळ खावा की गहू ?

Weight Loss करायचा आहे ? मग काय उत्तम भाकरी, भात की चपाती ? वजन कमी करायला काय करावं ? असा प्रश्न अनेकांना पडतो. यावर

Shimla Accident : हिमाचलमध्ये कारवर दरड कोसळली, १३ जणांचा मृत्यू तर सहा महिन्याच्या बाळाचा...

शिमला : हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पीती परिसरातील पांगी-उदयपूर मार्गावर दुपारी एक दुर्दैवी घटना घडली आहे.

Maharashtra Weather : जुलै संपत आला तरी महाराष्ट्रातील आठ जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातीळ अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. एका बाजूला कोकण आणि उत्तर

Nashik News : नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून पाणी विसर्गात वाढ; 94 हजार 497 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

Nashik News : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध धरणांमधून शुक्रवारी (दि. २४) सकाळपासून

Government Hospitals : आता सरकारी रुग्णालयांतील ‘पेशंट’ ठरवणार डॉक्टरांचे रिपोर्ट कार्ड

राज्य सरकारचा निर्णय; हॉटेल्सप्रमाणे सरकारी दवाखान्यांनाही मिळणार स्टार रेटिंग मुंबई(Mumbai) : सरकारी रुग्णालयाचे

Asian Cup Schedule 2026 : एशियन गेम्स २०२६ चे वेळेपत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार ?

मुंबई : एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धा