उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त; भेटीगाठी, देवदर्शन, प्रचार फेऱ्यांनी वातावरण निवडणूकमय

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या २२७ प्रभागांतील उमेदवारी अंतिम झाल्यानंतर पहिल्या रविवारी उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींना वेग दिला. सकाळी ७वाजल्यापासूनच उमेदवारांनी मतदारांना गाठणे सुरू केले. त्यात प्रामुख्याने सोसायट्यांच्या बैठका व प्रचार फेऱ्यांचा समावेश होता. प्रचारासाठी मोजकेच दिवस असल्याने रविवारी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरू होती. प्रमुख राजकीय पक्षांकडून मतदारसंघात आता नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. त्याद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागात प्रमुख पक्षाच्या उमेदवारांकडून प्रचार कार्यालयांच्या उद्घाटनाचा धडाकाही सुरू आहे. रविवार सार्थकी लावण्यासाठी बोरीवली, चारकोप, मालाड, कांदिवली, मागाठाणे आणि दहिसर या उत्तर मुंबईतील मतदारसंघांतील उमेदवारांनी दिवसभर जास्तीत जास्त मतदारांच्या भेटी घेतल्या. काही उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांऐवजी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला. सोसायट्यांमधील एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी उमेदवार सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत फिरत होते. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ५ वाजता प्रचाराला सुरुवात होऊन रात्री १० वाजेपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात होते.

Comments
Add Comment

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात

Eknath Shinde:  'शिवसेना जनतेच्या दारी' अभियान राज्यभर राबवणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरण या तीन मुद्द्यांवर भर देत 'शिवसेना

Eknath Shinde : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय लाटणे म्हणजे 'बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना'; उद्धव-राज, राहुल गांधींवर शिंदेंचा घणाघाती हल्ला

विद्यार्थ्यांच्या आंदोलना आडून विरोधकांचा अराजकतेचा डाव सरकारने उधळला मुंबई : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा

Pralhad Joshi : शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांची पदभार स्वीकारताच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच प्रल्हाद जोशी यांनी मंत्रालयाच्या

Narendra Modi : सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर-स्वावलंबी भारताच्या उभारणीचा निर्धार दृढ करूया - पंतप्रधान

नवी दिल्ली : आज संरक्षण उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांसोबतचं राजकीय सहकार्य असो, भारत