बंड शमले, अपक्ष वाढवणार ताप

ठाणे पालिका निवडणुकीत ८६ अपक्ष उमेदवार मैदानात


ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांना शांत करण्यात नेत्यांना यश आले असले, तरी ८६ अपक्ष उमेदवारांनी राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. ३३ प्रभागांतील चुरस आता या अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. १३१ जागांसाठी झालेल्या जागावाटपात अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. नेत्यांनी ९० टक्के बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यात यश मिळवले, तरी काही ठिकाणी बंडखोर अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम आहेत.
२०१७ मध्ये ठामपाची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. त्यानंतर २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपुष्टात आली, मात्र कोरोनामुळे निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.


तब्बल चार-पाच वर्षांनंतर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने शिंदे सेना, भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार व अजित पवार गट), मनसे, उबाठा गट या पक्षांतून इच्छुकांची संख्या जास्त होती.


मात्र महायुतीत जागा वाटपात कमी-अधिक जागा आल्यामुळे पक्षश्रेष्ठींना सर्वांना न्याय देता आला नाही. निष्ठावंतांना डावलल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. बंड थोपविण्यात ९० टक्के यश मिळाल्याचा दावा केला जात आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्थानिक नाराजी किंवा व्यक्तिगत आवेशातून अपक्ष म्हणून लढणाऱ्या उमेदवारांमुळे राजकीय पक्षांना आव्हान निर्माण झाले आहे. १३१ जागांसाठी १४१ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला, त्यापैकी ५५ उमेदवारांनी माघारी घेतली, तर प्रत्यक्ष ८६ अपक्ष उमेदवार रिंगणात उभे आहेत. त्यामुळे पक्षातील बंडखोरांचे बंड शमविण्यात यश आले असले तरी अपक्ष उमेदवारांसह बंडखोरीचे आव्हान कायम राहणार आहे.


उमेदवार बॅकफूटवर


निवडणूक होण्याआधीच अर्ज माघारीच्या दिवशी अपक्षांसह काही स्थानिक पक्षाचे उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले. माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), लोकराज्य पार्टी, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, जनता दल (सेक्युलर) आणि वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

लांजात जि.प.च्या ४ तर पं.स.च्या पाच उमेदवारांनी अर्ज मागे, जि.प. साठी ९ तर पंचायत समितीसाठी २६ उमेदवार रिंगणात

लांजा (संतोष कोत्रे) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २७ जानेवारी रोजी

सावंतवाडी तालुक्यात एक जिल्हा परिषद तर एक पंचायत समिती सदस्य बिनविरोध

शेर्ले पंचायत समिती गणातून भाजपचे महेश धुरी बिनविरोध, तालुक्यात तब्बल ४८ जणांनी अर्ज घेतले मागे सावंतवाडी :

पक्षशिस्तीचे उदाहरण : खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवींची निवडणुकीतून माघार

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली

राजापुरात जि.प. गटातून चार जणांची तर पंचायत समिती गणातुन १६ जणांची माघार

राजापूर : :राजापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या

परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे तेरा ते पंधरा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी

पनवेल महापालिकेचा डंका, १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्समध्ये राज्यात प्रथम

पनवेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्स