बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मंगळवार, ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० पासून आझाद मैदान येथे चड्डी बनियान आंदोलन पुकारले आहे, अशी माहिती सेवानिवृत्त बेस्ट अधिकारी कर्मचारी संघर्ष समितीचे नेते भाई पानवडीकर यांनी दिली. ऑगस्ट २०२२ पासून कामगार अधिकाऱ्यांची हक्काची देणी ग्रॅच्युइटी व अंतिम देयके अजून दिलेली नाहीत. १०० ते १५० कामगारांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. त्यांची ही देणी अद्याप त्यांच्या वारसांना मिळालेली नाहीत. तर काही कर्मचारी भिकेला लागले आहेत. अशी बिकट अवस्था बेस्टच्या सेवा निवृत्त कामगारांची झालेली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी या सर्वांना लेखी निवेदने आणि पत्र दिलेली आहेत परंतु सरकार अद्याप यात बिल्कूल लक्ष घालत नाही. आम्ही गेली ३० ते ३५ वर्षे या मुंबईच्या जनतेची अहोरात्र सेवा केली आहे.


२००५ मधील अतिवृष्टी, २०२० मध्ये करोना काळ, मुंबईत १९९३ मध्ये झालेली दंगल अशा अनेक आपत्कालीन वेळी बेस्टचे कामगार, अधिकारी यांनी जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली आणि आज या कामगारांना आपल्या हक्काची देणी मिळण्यासाठी 'चड्डी बनियन मोर्चा आंदोलन' करावे लागत आहे, ही या सरकारला शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब आहे. हे सर्वं ज्येष्ठ कामगार आहेत.


लोक अदालत आणि मा. उच्च न्यायालयाने देखील कामगारांना ताबडतोब देणी देण्यासंबंधी निर्णय दिला आहे. परंतु राज्य शासन आणि मुंबई महापालिका आयुक्त, मनपा कायदा १८८८ मध्ये तरतूद असून देखील जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. आम्हाला कोणी न्याय देइल काय ? असा संतप्त सवाल हे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी करीत आहेत.

Comments
Add Comment

पोलीस संरक्षण घेऊन शेखी मिरवणाऱ्या नेत्यांची सुरक्षा काढणार?

राज्य सरकार घेणार फेरआढावा; उच्चस्तरीय समितीची केली पुनर्रचना मुंबई : राज्यातील राजकीय नेते आणि

एमपीएससीचा लाखो उमेदवारांना दिलासा

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो

मुंबईत डिसेंबर महिन्यांत ५५७ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस

मुंबईतल्या २३३ ठिकाणच्या बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस मुंबई(विशेष प्रतिनिधी) : बांधकामामुळे निर्माण

'एक कोटी लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ करणार'

मुंबई : “राज्यात आतापर्यंत ५० लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. परभणी जिल्ह्यात एकट्या मेघना बोर्डीकर यांनी १

महानगरपालिका निवडणूक; आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई

भारताच्या ‘क्रिएटिव्ह इकोनॉमी’ला नवे बळमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यात २ हजार ४०० कोटींची भागीदारी

मुंबई : जागतिक मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप (यूएमजी) आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध