२०१७ च्या तुलनेत उमेदवारांच्या संख्येत २४ टक्क्यांनी घट

मुंबई : जवळपास ७ ते ८ वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये राज्यभरात इच्छुकांची भाऊगर्दी दिसत असताना, मुंबई पालिका निवडणुकीतील इच्छुकांच्या संख्येत मात्र २४ टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकीत मुंबईत २ हजार २७५ उमेदवार मैदानात उतरले होते. तर, यंदा १ हजार ७०० उमेदवार नगरसेवक पदाच्या शर्यतीत आहेत. देशातील सर्वात श्रीमंत आणि आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबईत ही निवडणूक शहराच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.


राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या अंतिम यादीतून ही माहिती समोर आली आहे. मुंबईत एकूण २ हजार २३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी ४५३ उमेदवारांनी माघार घेतली, तर १६७ अर्ज तांत्रिक कारणांमुळे अवैध ठरले. अशा प्रकारे अंतिम वैध उमेदवारांची संख्या १ हजार ७०० पर्यंत खाली आली. उमेदवारसंख्या कमी झाली असली, तरी मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये सरासरी ७.४९ उमेदवार मैदानात असल्याने स्पर्धा तीव्र राहणार आहे.


राज्यातील स्थिती काय?


राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांमध्ये एकूण २ हजार ८६९ नगरसेवक पदांसाठी १५ हजार ९३१ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. वैध ठरलेल्या २४ हजार ७७१ अर्जांपैकी ३५.७ टक्के (८,८४०) उमेदवारांनी माघार घेतली. मुंबईनंतर पुणे (१,१६६), नागपूर (९९३), छत्रपती संभाजीनगर (८५९) येथे उमेदवारांची संख्या जास्त आहे. नाशिकमध्ये माघारीचे प्रमाण सर्वाधिक (६६१) होते, तर पनवेलमध्ये सर्वात कमी (२५५) उमेदवार राहिले आहेत. राज्यात दीर्घकाळानंतर होत असलेल्या या महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी दिसली होती. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीने बंडखोरांना थंड करण्यात मोठे यश मिळवले.

Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची