भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून मुंबईला सोडवायचं आहे!

उपमुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका


मुंबई : राज्याच्या राजकारणात २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीचा आज मुंबईतील वरळीत मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.


या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचं आहे, मुंबईला भ्रष्टाचाराच्या मगरमिठीमधून सोडवायचं आहे’, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?


“आजची सभा ही मुंबईतील भ्रष्टाचाराच्या विरोधातील उठावाच्या ललकाराची सभा आहे. गेल्या एवढ्या वर्षांपासून मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी पडली होती. पण आता आपल्याला या मगरमिठीतून मुंबई आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे. बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे. त्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झाला आहे. लाडके मुंबईकर, या मुंबईवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत, मुंबई महापालिकेवर आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि मुंबई महापालिकेचा महापौर मराठीच होणार”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


“काही लोकांना निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो. मात्र, या मराठी माणसांसाठी तुम्ही काय केलं? हे सांगा. एक काम तरी तुम्ही मराठी माणसांसाठी केलं का? त्यांचा (उद्धव ठाकरे यांचा) म मराठीचा नाही, म मलिद्याचा आहे, म मतलबाचा आहे, म मुजोरीचा आहे, वरून किर्तन आणि आतून तमाशा, असं त्यांचं काम आहे. मात्र, आमचा म मराठीचा आहे, आमचा म महाराष्ट्राचा आहे, आमचा म महायुतीचा आहे. त्यांच्यामधील आणि आमच्यामधील हा फरक आहे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.


“मग तुम्ही २० वर्षांसाठी वेगवेगळे का आणि कोणासाठी झाला होतात? (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे), आता जनतेने तुमचा बॅड वाजवल्यानंतर तुम्हाला ब्रँडची आठवण आली. मात्र, खरा ब्रँड बाळासाहेब ठाकरेच आहेत, त्यानंतर महायुतीचा कार्यकर्ता खरा ब्रँड आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, शिवसेनेचा विचार आम्ही जपला आहे”, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे