भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून मुंबईला सोडवायचं आहे!

उपमुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका


मुंबई : राज्याच्या राजकारणात २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीचा आज मुंबईतील वरळीत मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.


या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचं आहे, मुंबईला भ्रष्टाचाराच्या मगरमिठीमधून सोडवायचं आहे’, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?


“आजची सभा ही मुंबईतील भ्रष्टाचाराच्या विरोधातील उठावाच्या ललकाराची सभा आहे. गेल्या एवढ्या वर्षांपासून मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी पडली होती. पण आता आपल्याला या मगरमिठीतून मुंबई आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे. बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे. त्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झाला आहे. लाडके मुंबईकर, या मुंबईवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत, मुंबई महापालिकेवर आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि मुंबई महापालिकेचा महापौर मराठीच होणार”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


“काही लोकांना निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो. मात्र, या मराठी माणसांसाठी तुम्ही काय केलं? हे सांगा. एक काम तरी तुम्ही मराठी माणसांसाठी केलं का? त्यांचा (उद्धव ठाकरे यांचा) म मराठीचा नाही, म मलिद्याचा आहे, म मतलबाचा आहे, म मुजोरीचा आहे, वरून किर्तन आणि आतून तमाशा, असं त्यांचं काम आहे. मात्र, आमचा म मराठीचा आहे, आमचा म महाराष्ट्राचा आहे, आमचा म महायुतीचा आहे. त्यांच्यामधील आणि आमच्यामधील हा फरक आहे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.


“मग तुम्ही २० वर्षांसाठी वेगवेगळे का आणि कोणासाठी झाला होतात? (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे), आता जनतेने तुमचा बॅड वाजवल्यानंतर तुम्हाला ब्रँडची आठवण आली. मात्र, खरा ब्रँड बाळासाहेब ठाकरेच आहेत, त्यानंतर महायुतीचा कार्यकर्ता खरा ब्रँड आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, शिवसेनेचा विचार आम्ही जपला आहे”, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेचे स्टॉल्स

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या