भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून मुंबईला सोडवायचं आहे!

उपमुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका


मुंबई : राज्याच्या राजकारणात २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीचा आज मुंबईतील वरळीत मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.


या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचं आहे, मुंबईला भ्रष्टाचाराच्या मगरमिठीमधून सोडवायचं आहे’, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?


“आजची सभा ही मुंबईतील भ्रष्टाचाराच्या विरोधातील उठावाच्या ललकाराची सभा आहे. गेल्या एवढ्या वर्षांपासून मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी पडली होती. पण आता आपल्याला या मगरमिठीतून मुंबई आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे. बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे. त्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झाला आहे. लाडके मुंबईकर, या मुंबईवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत, मुंबई महापालिकेवर आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि मुंबई महापालिकेचा महापौर मराठीच होणार”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


“काही लोकांना निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो. मात्र, या मराठी माणसांसाठी तुम्ही काय केलं? हे सांगा. एक काम तरी तुम्ही मराठी माणसांसाठी केलं का? त्यांचा (उद्धव ठाकरे यांचा) म मराठीचा नाही, म मलिद्याचा आहे, म मतलबाचा आहे, म मुजोरीचा आहे, वरून किर्तन आणि आतून तमाशा, असं त्यांचं काम आहे. मात्र, आमचा म मराठीचा आहे, आमचा म महाराष्ट्राचा आहे, आमचा म महायुतीचा आहे. त्यांच्यामधील आणि आमच्यामधील हा फरक आहे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.


“मग तुम्ही २० वर्षांसाठी वेगवेगळे का आणि कोणासाठी झाला होतात? (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे), आता जनतेने तुमचा बॅड वाजवल्यानंतर तुम्हाला ब्रँडची आठवण आली. मात्र, खरा ब्रँड बाळासाहेब ठाकरेच आहेत, त्यानंतर महायुतीचा कार्यकर्ता खरा ब्रँड आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, शिवसेनेचा विचार आम्ही जपला आहे”, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती