साखरेच्या उत्पादनात उत्तर प्रदेशच्या पुढे महाराष्ट्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साखरेच्या सीझनची जोरदार सुरुवात झाली. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रिज लिमिटेड अर्थात NFCSF च्या ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ मध्ये देशातील साखरेचे सरासरी वार्षिक उत्पादन २३.४३ टक्के वाढून ११.८३ मिलियन टन पोहोचले आहे. देशातील साखरेच्या उत्पादन वाढीमागे महाराष्ट्रातील साखर उत्पादनातील वाढ कारणीभूत ठरली आहे. NFCSF नुकतेच जारी केलेल्या निवेदनात सांगितले की ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देशातील सुमारे ४९९ साखर कारखान्यांनी गळीप हंगामात भाग घेतला. या दरम्यान १३४ मिलियन टन उसाचे गाळप झाले. ज्यामुळे ११.८ मिलियन टन साखरेचे उत्पादन झाले. या दरम्यान सरासरी साखरेची रिकव्हरी ८.८३ टक्के राहिली. देशात ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ दरम्यान उत्तर प्रदेशात साखर उत्पादन वाढून ३.५६ मिलियन टन झाले आहे. ही वाढ महाराष्ट्राच्या तुलनेत कमी राहिली. देशाचे दुसरे सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे. या राज्यात साखरेचे उत्पादन ६३ टक्के वाढून ४.८७ मिलियन टन पोहचले. जे गेल्यावर्षी २.९९ मिलियन टन होते. ऊस उपलब्धता आणि साखर कारखान्याची निरंतर गाळप क्षमतेमुळे महाराष्ट्र या हंगामात ग्रोथ इंजिन बनला आहे.

Comments
Add Comment

शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाचा प्रोमो समोर; रिलीज तारीख जाहीर...

मुंबई : चित्रपट सृष्टीतील सर्वांचा आवडता अभिनेता शाहरुख खान. शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'किंग'ची

गंभीर आजार टाळण्यासाटी, वर्षातून एकदा करा ‘या’ चाचण्या

TOP BLOOD TESTS TO DO EVERY YEAR : गंभीर आजार वेळेवर ओळखता यावेत आणि ते टाळता यावेत यासाठी वर्षातून एकदा नियमित आरोग्य तपासणी (हेल्थ

बुलढाण्यात झेंडावंदन कार्यक्रमात मुख्याध्यापकांचा हृदयविकाराच्या झटक्यानी मृत्यू; गावात पसरली शोककळा

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात हृदय पिळवणारी घटना घडली आहे. ७७ व्या प्रजासत्ताक दिनी सगळीकडे उत्साहाचं वातावरण

भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळी घसरणच अस्थिरता निर्देशांक १३% वर 'या' कारणामुळे

मोहित सोमण: भारत व ईयु एफटीएसाठी अनिश्चितता व युएस इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी आज एकदा

संजीवनी सैनिकी स्कूल राष्ट्रीय ब्रास बॅण्ड स्पर्धेत देशात प्रथम

कोपरगाव : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील नॅशनल बाल भवन येथे भारत सरकारच्या संरक्षण

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने