मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळांचा उबाठाला 'जय महाराष्ट्र'


मुंबई : उद्धव आणि राज यांनी संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला. पण आजच्या दिवशी उबाठाला मोठा धक्का बसला. मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला. शुभा राऊळ कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अद्याप समजलेले नाही. पण त्या महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.


माजी महापौर शुभा राऊळ यांनी उबाठाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंकडे शुभा राऊळ यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. राजीनामा दिल्यानंतर शुभा राऊळ यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. भाजप नेते प्रविण दरेकरांच्या निवासस्थानी राऊळ आणि शेलार यांच्यात चर्चा झाली.




कोण आहेत शुभा राऊळ ?


शुभा राऊळ या २००७ ते २००९ या कालावधीत मुंबईच्या महापौर होत्या. त्या उबाठाच्या महिला नेत्या पण होत्या. दहिसरमधून अनेक टर्म नगरसेविका झालेल्या शुभा राऊळ यांनी महापौर असताना हुक्का पार्लर बंदीचा निर्णय घेतला. उबाठातील विनोद घोसाळकरांच्या राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या शुभा राऊळ यांनी २०१४ मध्ये मनसेत प्रवेश केला होता. पण अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी घरवापसी केली होती. एकनाथ शिंदे यांनी वेगळा विचार केल्यानंतरही शुभा राऊळ उद्धव ठाकरेंसोबतच होत्या. पण मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


उबाठा सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना भाजपने मुंबईच्या वॉर्ड क्रमांक दोनमधून उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर काही दिवसांनी शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


Comments
Add Comment

Norway Chess: नॉर्वे चेसमध्ये भारतीयांचा दमदार कमबॅक! प्रज्ञानानंद-गुकेशची विजयी चाल; दिव्या देशमुख विजेतेपदाच्या शर्यतीत कायम

मुंबई : सहाव्या फेरीतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय बुद्धिबळपटूंनी नॉर्वे चेस स्पर्धेत शानदार पुनरागमन केले

Nashik Bus Fire News : धावत्या एसटीला भीषण आग; चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

Nashik Bus Fire News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Agra National Highway) चांदवडजवळील रेणुकादेवी घाटात मंगळवारी दुपारी एक मोठी

Cabinet Minister Mangalprabhat Lodhan : गिरगावकरांना दिलासा मिळेपर्यंत वीजपुरवठा समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा केला जाईल

वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास नगरसेविका सौ स्नेहल तेंडुलकर यांनी दिला आंदोलनाचा इशारा मुंबई : गिरगाव परिसरात

PM SVANidhi Yojana: : पीएम स्वनिधी योजनेला ६ वर्षे पूर्ण, हजारो लोक घेत आहेत फायदा ; योजना नक्की आहे तरी काय ?

PM SVANidhi Yojana : पीएम स्वनिधी योजना केंद्र सरकारच्या महत्त्कांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेला सहा वर्षे पूर्ण झाली

IND vs AFG Test : टीम इंडियात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणाऱ्या आकिब नबीला BCCI ने दिली संधी; प्लेइंग-११ मध्ये उलथापालथ

Mumbai : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या निवडीवरून वाद निर्माण झाला होता. रणजी

No-Parking Restrictions Ulhasnagar Roads : ठाणेकरांनो लक्ष द्या! उल्हासनगरमधील 'या' ५ मुख्य रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांचा कडक निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar) दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक