शाहरुख खानच्या या निर्णयामुळे देशभरात वाद; राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या टोकाच्या प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका निर्णयामुळे देशभरातून त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात असून, काही संघटनांकडून तीव्र आंदोलन आणि आक्षेपार्ह वक्तव्येही केली जात आहेत. बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानविरोधात संतापाची लाट उसळल्याचं चित्र आहे.


बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचारांमुळे देशात आधीच तीव्र भावना आहेत. अशा परिस्थितीत शाहरुख खानने आपल्या आयपीएल संघासाठी बांगलादेशी क्रिकेटपटूची निवड केल्याचा आरोप केला जात असून, त्याच निर्णयामुळे हा वाद अधिक चिघळला आहे. काही जणांनी शाहरुख खानवर देशविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत त्याला गद्दार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.


मेरठच्या दौराळा भागात आयोजित अटल स्मृती संमेलनात बोलताना भाजप नेते संगीत सोम यांनी शाहरुख खानवर गंभीर आरोप केले. आयपीएलमध्ये बांगलादेशी क्रिकेटपटूला कोट्यवधी रुपयांना खरेदी करणं हे देशविरोधी कृत्य असल्याचं त्यांनी म्हटलं. अशा लोकांना देशात राहण्याचा अधिकार नसल्याचा दावाही त्यांनी केला. बॉलिवूड आणि क्रिकेटच्या माध्यमातून देशविरोधी शक्तींना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.


दरम्यान, अखिल भारतीय हिंदू महासभेनेही शाहरुख खानच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. शाहरुख खानने आपल्या आयपीएल संघात बांगलादेशी खेळाडूचा समावेश केल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. या निषेधादरम्यान काही ठिकाणी अत्यंत आक्षेपार्ह आणि टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.


आग्रा येथील हिंदू महासभेच्या जिल्हाध्यक्ष मीरा राठोड यांनी केलेलं वक्तव्य विशेष चर्चेत आलं आहे. त्यांनी शाहरुख खानवर गंभीर आरोप करत अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं, ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


याच प्रकरणात दिनेश फलाहारी महाराज यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून शाहरुख खानवर आरोप केले आहेत. शाहरुख खानला बांगलादेशातील परिस्थितीची माहिती असूनही त्याने बांगलादेशी खेळाडूला मोठ्या रकमेवर विकत घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, शाहरुख खानचे बांगलादेशातील काही कट्टर घटकांशी संबंध असू शकतात, असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. या आरोपांमुळे संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर होत चाललं आहे.


दरम्यान, या सर्व घडामोडींवर शाहरुख खान किंवा त्याच्या व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या वादामुळे सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू असून, समर्थन आणि विरोध अशा दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,