KBC १७ सीझनचा प्रवास संपला ,अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांत पाणी

मुंबई: २००० साली सुरू झालेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो आजही तितकाच लोकप्रिय आहे. गेल्या अनेक वर्षांत या कार्यक्रमाने अनेक विक्रम नोंदवले असून, आता शोचा १७ वा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या सीझनच्या शेवटच्या भागात कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.


टीव्ही विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय शोपैकी एक असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १७ व्या सीझनचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या सीझनला निरोप देताना बिग बींनी प्रेक्षकांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं आणि स्टुडिओतील वातावरणही भावनिक झालं.


शोच्या शेवटच्या भागात प्रेक्षकांशी संवाद साधताना अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, काही क्षण इतक्या वेगाने निघून जातात की ते कधी सुरू झाले आणि कधी संपायला आले, हे कळतच नाही. माझ्या आयुष्याचा एक तृतीयांशपेक्षा अधिक काळ मी या मंचावर तुमच्यासोबत घालवला आहे आणि यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.


ते पुढे म्हणाले, मी जेव्हा हसलो तेव्हा तुम्हीही माझ्यासोबत हसलात. जेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू आले, तेव्हा तुमच्याही डोळ्यांत पाणी होतं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही माझ्या या प्रवासाचे साक्षीदार आहात. तुम्ही आहात म्हणून हा खेळ आहे आणि हा खेळ आहे म्हणून आम्ही आहोत.


निरोपाच्या या क्षणी वातावरण काहीसे गंभीर झालं होतं, मात्र अमिताभ बच्चन यांनी आपल्या खास शैलीत प्रेक्षकांचा उत्साह कायम ठेवला. या भागात गेल्या १७ सीझनमधील खास क्षणांचा एक विशेष व्हिडीओही दाखवण्यात आला. हा आठवणींचा प्रवास पाहून बिग बींसह स्पर्धक आणि प्रेक्षकही भावूक झाल्याचं दिसून आलं.

Comments
Add Comment

Arijit Singh Comeback : 'आवारापन २' मधून अरिजीत सिंह करणार पुनरागमन

मुंबई : लोकप्रिय गायक अरिजीत सिंह (Arijit Singh) लवकरच प्लेबॅक सिंगिंगमध्ये पुनरागमन करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांचे

Ramayana Part 1 Trailer : रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर रिलीज होण्याआधीच लीक; निर्मात्यांनी उचलले 'हे' कठोर पाऊल!

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुख्य भूमिकेत असलेल्या 'रामायण: पार्ट १' (Ramayana Part 1) या चित्रपटाची

Salman Khan : सलमान खानच्या तब्येतीला काय झालं ? चाहत्यांचं टेन्शन वाढलं!

मुंबई(Mumbai) : बॉलीवूडचा भाई जान म्हणजेच सलमान खान हा त्याच्या फीट बॉडीमुळे नेहमी चर्चेत असायचा. मात्र सध्या सोशल

Saamana Movie : 'सामना'चा ५० वर्षांनंतरही तोच दबदबा! चित्रपटगृह हाऊसफुल

- सामनामध्ये आजही प्रेक्षकांना खेचून आणण्याची ताकद - आशिष शेलार मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर कलाकृती

Ek Hota Maalin Trailer : 'एक होतं माळीण' चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

मुंबई (Mumbai): काही वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन गाडल्या गेलेल्या माळीण गावाचा थरार आता मोठ्या पडद्यावर

National Film Awards : 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीची दमदार कामगिरी; 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मान

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचे मानले जाणारे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले असून