विद्यार्थ्यांना दंडाऐवजी समाजसेवा करण्याचा न्यायालयाचा आदेश; जेईई मेन्स उत्तरपत्रिका फेरफार प्रकरण

नवी दिल्ली : संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई मेन्स) २०२५ च्या उत्तरपत्रिकेत फेरफार केल्याचा आरोप असलेल्या दोन विद्यार्थ्यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मात्र, विद्यार्थ्यांचे अल्पवय आणि भविष्यातील शैक्षणिक कारकिर्द लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांच्यावर ठोठावलेला आर्थिक दंड रद्द करत, त्याऐवजी एक महिना समाजसेवा करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा निकाल मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने दिला.


या प्रकरणात संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिकेत फेरफार झाल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) या आरोपांची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर केला होता. तसेच नॅशनल सायबर फॉरेन्सिक लॅबोरेटरीने (एनएफसीएल) दिलेल्या फॉरेन्सिक अहवालात उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड झाल्याचे स्पष्ट निष्कर्ष नोंदविण्यात आले होते. या अहवालाच्या आधारे दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांनी २२ सप्टेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांवर प्रत्येकी ३०,००० रुपयांचा दंड ठोठावला होता.


या निकालाविरोधात विद्यार्थ्यांनी खंडपीठात अपील दाखल केले. मात्र खंडपीठाने एकल न्यायाधीशांचा निर्णय योग्य ठरवत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली. भारतीय राज्यघटनेच्या कलम २२६ अंतर्गत अशा तांत्रिक आणि तथ्यात्मक वादांवर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले.


विद्यार्थ्यांचे वय कमी असून त्यांनी नुकतीच १२ वी उत्तीर्ण केली असल्याने त्यांच्या भविष्यातील शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होऊ नये, या दृष्टीने न्यायालयाने सहानुभूती दाखवली. आर्थिक दंड रद्द करून, एका विद्यार्थ्याला वृद्धाश्रमात, तर दुसऱ्या विद्यार्थ्याला बालसंगोपन केंद्रात एक महिना समाजसेवा करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच न्यायालयाने त्यांना कडक ताकीद देत भविष्यात अशा प्रकारच्या कृत्यांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

संजय गांधी.. माधवराव सिंधिया ते अजितदादा; विमान अपघातात देशाने मोठे नेते गमविले

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. लँडिंग करताना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर

‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी

भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये

Jammu And Kashmir : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक; CRPF जवानांसह चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक