विद्यार्थ्यांना दंडाऐवजी समाजसेवा करण्याचा न्यायालयाचा आदेश; जेईई मेन्स उत्तरपत्रिका फेरफार प्रकरण

नवी दिल्ली : संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई मेन्स) २०२५ च्या उत्तरपत्रिकेत फेरफार केल्याचा आरोप असलेल्या दोन विद्यार्थ्यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मात्र, विद्यार्थ्यांचे अल्पवय आणि भविष्यातील शैक्षणिक कारकिर्द लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांच्यावर ठोठावलेला आर्थिक दंड रद्द करत, त्याऐवजी एक महिना समाजसेवा करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा निकाल मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने दिला.


या प्रकरणात संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिकेत फेरफार झाल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) या आरोपांची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर केला होता. तसेच नॅशनल सायबर फॉरेन्सिक लॅबोरेटरीने (एनएफसीएल) दिलेल्या फॉरेन्सिक अहवालात उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड झाल्याचे स्पष्ट निष्कर्ष नोंदविण्यात आले होते. या अहवालाच्या आधारे दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांनी २२ सप्टेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांवर प्रत्येकी ३०,००० रुपयांचा दंड ठोठावला होता.


या निकालाविरोधात विद्यार्थ्यांनी खंडपीठात अपील दाखल केले. मात्र खंडपीठाने एकल न्यायाधीशांचा निर्णय योग्य ठरवत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली. भारतीय राज्यघटनेच्या कलम २२६ अंतर्गत अशा तांत्रिक आणि तथ्यात्मक वादांवर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले.


विद्यार्थ्यांचे वय कमी असून त्यांनी नुकतीच १२ वी उत्तीर्ण केली असल्याने त्यांच्या भविष्यातील शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होऊ नये, या दृष्टीने न्यायालयाने सहानुभूती दाखवली. आर्थिक दंड रद्द करून, एका विद्यार्थ्याला वृद्धाश्रमात, तर दुसऱ्या विद्यार्थ्याला बालसंगोपन केंद्रात एक महिना समाजसेवा करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच न्यायालयाने त्यांना कडक ताकीद देत भविष्यात अशा प्रकारच्या कृत्यांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

उमर खालिदला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : दिल्लीत २०२०च्या दंगलींशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय

AAP Sarpanch Shot in Amritsar : अमृतसरमध्ये थरार! लग्नमंडपात घुसून 'आप' नेत्याची डोक्यात गोळी झाडून हत्या; अवघ्या १३ सेकंदात आरोपी पसार

चंदीगड : पंजाबमध्ये गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना अमृतसरमध्ये घडली

आसाममध्ये भल्या पहाटे भूकंप! नागरिकांची उडाली धावपळ; वाचा सविस्तर

गुवाहाटी : आसाममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

PM modi on Somnath Temple : विध्वंस नव्हे, हा तर स्वाभिमानाचा विजय! सोमनाथच्या १००० वर्षांच्या अढळ विश्वासावर पंतप्रधान मोदींचा विशेष लेख

पाटण : गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आणि कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सोमनाथ मंदिरावर

एक लाख 'ड्रोन वॉरियर्स'सह 'भैरव स्पेशल फोर्स' सज्ज

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; भारतीय लष्कराची झेप नवी दिल्ली : आधुनिक युद्धशास्त्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवत

कुटुंबातील घट्ट नाती ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना रोखू शकतात: मोहन भागवत

भोपाळ : एका कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद आणि त्यांच्यातील घट्ट नाते लव्ह जिहादसारख्या घटना रोखू शकतात.