वसई-विरार पालिका निवडणुकीत ५४७ उमेदवार रिंगणात

विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत २८६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे एकूण ५४७ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली असून, काही प्रमाणात उमेदवारांची मनधरणी करण्यातही राजकीय पक्षांना यश आले आहे.


वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी विविध राजकीय पक्षाच्या व अपक्ष अशा ९३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील ६४ अर्ज छाननी दरम्यान बाद झाले होते. तर ८३३ अर्ज वैध ठरविण्यात आले होते.


शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यादिवशी २८६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ५४७ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.


प्रभागनिहाय     उमेदवार   संख्या




  1. प्रभाग               माघार      कायम

  2. ए                        १८         ४०

  3. बी                       १५        ७८

  4. सी                      ५०        ५९

  5. डी                      १५         ६८

  6. ई                        ३९         ५०

  7. एफ                    ४२         ७४

  8. जी                      ४२         ६६

  9. एच                     ३७         ५४

  10. आय                  २८           ५८

Comments
Add Comment

मुंबईतील रेलिंगचे वाढीव दराने कंत्राट कुणाच्या दबावाखाली दिले; शिवसेना अमेय घोले यांचा उबाठाला सवाल

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने संभाव्य कंत्राट कामांच्या निविदा भाजपने पारदर्शी कारभाराची चुणूक दाखवून रद्द

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा