४५० वर्षांची परंपरा जपणारी शिराळे गावची ‘गावपळण’सुरू

गावाबाहेरील राहुट्यांत नागरिकांनी थाटला संसार


वैभववाडी : दरवर्षी होणाऱ्या अनोख्या आणि परंपरागत गावपळणीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे गावाची गावपळण अलीकडेच सुरू झाली आहे. ग्रामदैवत श्री गांगेश्वराने कौल दिल्यानंतर शिराळे वाशीयांनी आपली गुरेढोरे, कोंबड्या, कुत्रे यांच्यासह गाव सोडत सडूरे गावच्या हद्दीत, दडोबा डोंगराच्या पायथ्याशी नैसर्गिक अधिवासात उभारलेल्या राहुट्यांत आपला संसार थाटला आहे.


वैभववाडीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले शिराळे हे स्वतंत्र महसुली गाव असून येथे मराठा व धनगर समाजाची सुमारे ८० कुटुंबे आणि ३५० लोकसंख्या आहे. षौष महिन्याच्या सुरुवातीला दरवर्षी होणारी ही गावपळण सुमारे ४५० वर्षांहून अधिक काळापासून सुरू असल्याची माहिती गावातील जाणकार वयोवृद्धांनी दिली.


सडूरे गावच्या माळरानावर तब्बल ४० राहुट्या उभारण्यात आल्या असून प्रत्येक राहुट्यांसमोर गुरांसाठी गाताड्या बांधण्यात आल्या आहेत. अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंसह आबालवृद्ध, कडक्याच्या थंडीतही या गावपळणीत उत्साहाने सहभागी झाले आहेत. गावपळणी दिवशी घरातून बाहेर पडलेला दिवस गृहित धरला जात नाही. गावपळणीनंतर पहिले तीन दिवस कोणताही ग्रामस्थ गावाकडे फिरकत नाही. या काळात गावची प्राथमिक शाळा राहुट्यांजवळील आंब्याच्या झाडाखाली भरते, तर एस.टी. बस थांबाही तिथेच असतो. पिण्यासाठी लगतच्या शुकनदी पात्रातील झऱ्याचे पाणी वापरले जाते.आजच्या धावपळीच्या युगात शहराकडे धावणाऱ्या माणसाचे निसर्गाशी असलेले नाते तुटत असताना, शिराळे गावची गावपळण माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाते घट्ट करणारी परंपरा ठरत आहे. मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून ग्रामस्थ दिवसभर गप्पागोष्टी करतात, मुले मनसोक्त खेळतात, तर रात्री भजनाच्या माध्यमातून आनंद साजरा करतात.


परतीच्या दिवशी ‘घोरपी’ उत्सव


तीन दिवसांनंतर पुन्हा ग्रामदैवत गांगेश्वराला कौल लावण्यात येणार असून, देवाचा हुकूम मिळाल्यानंतर पाच किंवा सात दिवसांनी ग्रामस्थ परत गावात दाखल होतील. गावात परतण्याच्या दिवशी रात्री ‘घोरपी’ हा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवासाठी नातेवाईक व मित्रपरिवार आवर्जून उपस्थित राहतात आणि सर्वांना महाप्रसाद दिला जातो.

Comments
Add Comment

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Healthy Drinks : चहा महागला म्हणून चिंता सोडा! सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पेय; शरीर होईल डिटॉक्स अन् वजनही घटेल

साखर आणि चहाचे भाव वाढल्याने खिशावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्याला उत

Weight Loss Tips : व्यायामाशिवाय वजन कमी करायचंय? मग आहारात ‘या’ पदार्थांचा नक्की करा समावेश

मुंबई : वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच आहाराकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकांना नियमित