राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीचा झेंडा फडकला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा विश्वासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी करत रत्नदुर्ग पिस्टल आणि रायफल शूटिंग क्लबचा होतकरू नेमबाज स्वयं विक्रांत देसाई याने नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे. २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल – ज्युनिअर सिव्हिलियन प्रकारात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत स्वयंने देशातील अव्वल नेमबाजांमध्ये आपली अचूक छाप उमटवली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या ज्युनिअर सिव्हिलियन संघात स्वयं विक्रांत देसाई यांसह साईराज काटे आणि प्रांशू सूर्यवंशी यांची निवड झाली होती. या तिघांनीही अत्यंत काट्याच्या लढतीत विलक्षण एकाग्रता, वेग आणि अचूकतेचे प्रदर्शन करत संघाला यशाच्या शिखरावर नेले.


त्यांच्या सामूहिक कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाला कांस्य पदक मिळवण्यात यश आले. स्वयं देसाईची ही कामगिरी त्याच्या नेमबाजी कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानली जात असून, रत्नागिरी जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरली आहे. या यशाबद्दल स्वयंचे क्रीडा वर्तुळातून अभिनंदन होत असून, भविष्यात तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

BSNL युजर्ससाठी खुशखबर; नेटवर्क नसले तरी करता येतील कॉल्स आणि मेसेज

मुंबई : मोबाईल नेटवर्क नसले तरी आता कॉल आणि मेसेज करता येणार आहेत. होय तुम्ही बरोबर वाचताय. नवीन वर्षाच्या

हेमंत ढोमेच्या सिनेमाची धडाकेबाज कमाई ; लवकरच पार करणार १ कोटींचा आकडा

KJVMM Box Office: वर्षाच्या पहिल्याच दिवशी मराठी शाळेतल्या पोरांनी बॉक्स ऑफिस गाजवलं मुंबई: महाराष्ट्रात आज 'मराठी भाषा'

भारतच नव्हे, लंडनच्या ट्रेनमध्येही विकले जातात समोसे..

लंडन : सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील ट्रेनमधील एक फोटो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक भारतीय व्यक्ती

दीपिकाला सोडून आता संदीप रेड्डी वांगांच्या ‘स्पिरिट’मध्ये ‘नॅशनल क्रश’ ची एंट्री

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

जेवल्यानंतर एक ग्लास ताक पिण्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

ताक हे आरोग्यासाठी गुणकारी असून पूर्वीपासूनच आहारामध्ये ताकाचा समावेश केला जातो. ताक आणि दही हे दोन्हीही पदार्थ

प्लंबिंगपासून ते दिग्दर्शनापर्यंतचा प्रवास, ‘रुबाब’मधून मराठी सिनेसृष्टीत नव्या दिग्दर्शकाची एन्ट्री

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नवनव्या विषयांसोबतच स्वतःच्या संघर्षातून घडलेले नवे दिग्दर्शक आपली ओळख निर्माण