कल्याण डोंबिवली मनपाच्या निवडणूक रिंगणात आता ४९० उमेदवार


डोंबिवली : कल्याण डोंबिवली मनपाच्या निवडणूक रिंगणात आता ४९० उमेदवार आहेत. मनपाच्या १२२ जागांसाठी या उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. अर्ज केलेल्या २०५ जणांनी माघार घेतली. यामुळे निवडणूक रिंगणात ४९० उमेदवार उरले आहेत.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे १५ आणि शिवसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.


कडोंमपा अर्थात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने या निवडणुकीसाठी युती केल्याची घोषणा केली. भाजप ६५ जागांवर आणि शिवसेना ५७ जागांवर लढणार असे जाहीर करण्यात आले. दोन्ही पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी नियमांचे पान करत उमेदवारी अर्ज भरले. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल झाले. पण छाननी प्रक्रियेत काही अर्ज बाद झाले तर काही उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या १५ उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला.


प्रभाग क्रमांक १८ मधून रेखा चौधरी, प्रभाग क्रमांक २६ क मधून आसावरी नवरे आणि प्रभाग क्रमांक २६ ब मधून रंजना पेणकर यांच्या विरोधात दाखल झालेले सर्व उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले. तर उर्वरित बारा उमेदवारांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या अनेक उमेदवारांनी माघार घेतली. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बंडखोरांची समजूत काढली. बंड थंड झाले. यानंतर रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अनेक उमेदवारांनी विकासाच्या मुद्यावर भाजपला पाठिंबा देत माघारीची घोषणा केली. माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे एकूण १५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले.


Comments
Add Comment

Gold-Silver Rate : आनंदवार्ता! चांदी १४ हजारांनी कोसळली तर सोन्याचा भाव १.६० लाखांच्या खाली

मुंबई : आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

Asia Cup U-18 Hockey Ind vs Pak : भारताने पाकिस्तानला नमवत गाठली अंतिम फेरी; आशिष तानी पूर्तिचा चौकार, 5-3 ने दणदणीत विजय

Mumbai : पुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 5-3 ने पराभव केला.

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली