कल्याण डोंबिवली मनपाच्या निवडणूक रिंगणात आता ४९० उमेदवार


डोंबिवली : कल्याण डोंबिवली मनपाच्या निवडणूक रिंगणात आता ४९० उमेदवार आहेत. मनपाच्या १२२ जागांसाठी या उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. अर्ज केलेल्या २०५ जणांनी माघार घेतली. यामुळे निवडणूक रिंगणात ४९० उमेदवार उरले आहेत.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे १५ आणि शिवसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.


कडोंमपा अर्थात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने या निवडणुकीसाठी युती केल्याची घोषणा केली. भाजप ६५ जागांवर आणि शिवसेना ५७ जागांवर लढणार असे जाहीर करण्यात आले. दोन्ही पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी नियमांचे पान करत उमेदवारी अर्ज भरले. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल झाले. पण छाननी प्रक्रियेत काही अर्ज बाद झाले तर काही उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या १५ उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला.


प्रभाग क्रमांक १८ मधून रेखा चौधरी, प्रभाग क्रमांक २६ क मधून आसावरी नवरे आणि प्रभाग क्रमांक २६ ब मधून रंजना पेणकर यांच्या विरोधात दाखल झालेले सर्व उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले. तर उर्वरित बारा उमेदवारांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या अनेक उमेदवारांनी माघार घेतली. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बंडखोरांची समजूत काढली. बंड थंड झाले. यानंतर रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अनेक उमेदवारांनी विकासाच्या मुद्यावर भाजपला पाठिंबा देत माघारीची घोषणा केली. माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे एकूण १५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले.


Comments
Add Comment

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाहीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत (Maratha Community's Demands) राज्य शासन सकारात्मक असून, विविध प्रशासकीय विभागांकडे

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून