कल्याण डोंबिवली मनपाच्या निवडणूक रिंगणात आता ४९० उमेदवार


डोंबिवली : कल्याण डोंबिवली मनपाच्या निवडणूक रिंगणात आता ४९० उमेदवार आहेत. मनपाच्या १२२ जागांसाठी या उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. अर्ज केलेल्या २०५ जणांनी माघार घेतली. यामुळे निवडणूक रिंगणात ४९० उमेदवार उरले आहेत.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे १५ आणि शिवसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.


कडोंमपा अर्थात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने या निवडणुकीसाठी युती केल्याची घोषणा केली. भाजप ६५ जागांवर आणि शिवसेना ५७ जागांवर लढणार असे जाहीर करण्यात आले. दोन्ही पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी नियमांचे पान करत उमेदवारी अर्ज भरले. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल झाले. पण छाननी प्रक्रियेत काही अर्ज बाद झाले तर काही उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या १५ उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला.


प्रभाग क्रमांक १८ मधून रेखा चौधरी, प्रभाग क्रमांक २६ क मधून आसावरी नवरे आणि प्रभाग क्रमांक २६ ब मधून रंजना पेणकर यांच्या विरोधात दाखल झालेले सर्व उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले. तर उर्वरित बारा उमेदवारांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या अनेक उमेदवारांनी माघार घेतली. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बंडखोरांची समजूत काढली. बंड थंड झाले. यानंतर रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अनेक उमेदवारांनी विकासाच्या मुद्यावर भाजपला पाठिंबा देत माघारीची घोषणा केली. माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे एकूण १५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले.


Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती