Maharashtra Government Update: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सौरऊर्जेचा मोठा निर्णय, घराघरांत स्वयंपूर्ण वीज, खर्चात बचत शक्य

प्रतिनिधी: सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी सरकार आग्रही असताना नव्या निर्णयात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे .आता जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपाययोजना) अंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या घराच्या छतावर १ केडब्ल्यू (1 KW) क्षमतेचे सौरऊर्जा संयंत्र बसवणे या नवीन योजनेस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासोबतच केंद्र शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासनाकडून अतिरिक्त १५००० अनुदान देण्यासही शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा अधिकृत शासन आदेश पारित झालेला आहे.


या निर्णयाबाबत बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले की,'अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील अनेक कुटुंबांना घरकुल योजना मिळाल्या असल्या तरी सुरुवातीचा खर्च परवडत नसल्याने सौरऊर्जेचा लाभ घेता येत नव्हता. ही अडचण दूर करण्यासाठी मी सातत्याने मुख्यमंत्री याना पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला.' त्यामुळे आज आज मंत्री आशिष जयस्वाल याच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे सांगितले जात आहे.


मंत्री जयस्वाल यांच्या मते, या निर्णयामुळे लाभार्थ्यांना स्वच्छ, शाश्वत आणि किफायतशीर वीज उपलब्ध होणार असून मासिक वीजबिलातही मोठी बचत होईल. उपलब्ध माहितीनुसार, या योजनेअंतर्गत इंदिरा आवास, रमाई आवास तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुसूचित जातीचे पात्र लाभार्थी केंद्र शासनाच्या पीएम–सूर्यघर: मोफत वीज योजना अंतर्गत मधून ३०००० रूपयांचे अनुदान घेऊ शकतील तसेच त्यासोबत राज्य शासनाकडून मिळणाऱ्या १५००० अतिरिक्त अनुदानाच्या मदतीने १ केडब्ल्यू सौरऊर्जा संयंत्र बसवू शकणार आहेत असे सरकारने यावेळी स्पष्ट केले.


परिणामी, दरमहा सुमारे १०० युनिटपर्यंत वीज उपलब्ध होऊन पर्यावरणपूरक ऊर्जेला चालना मिळेल, तसेच कुटुंबांच्या आर्थिक भारातही लक्षणीय घट होईल. याविषयी पुढे बोलताना, 'सामाजिक न्यायासोबत पर्यावरणीय न्याय साधण्याचा हा प्रयत्न आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना ऊर्जा स्वयंपूर्ण बनवणे, त्यांचे जीवनमान उंचावणे आणि हरित ऊर्जेच्या दिशेने महाराष्ट्राला पुढे नेणे, हाच या निर्णयाचा खरा उद्देश आहे' असेही आशिष जयस्वाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

हाय व्होल्टेज भारत - पाकिस्तान सामन्यात कोण कोण खेळणार ?

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये आज म्हणजेच रविवार १५ फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार

Mahashivratri 2026: श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त

T20 World Cup 2026 IND vs PAK: सूर्यकुमार यादवने केली उस्मान तारिकची नक्कल; व्हिडीओ वायरल

कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा

"बंजारा समाजाला न्याय मिळणार; समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन" - उपमुख्यमंत्री शिंदे

वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास

तरुण नोकरी मागायला आला आणि बंदूक असलेली बॅग विसरला, आमदार केनेकरांच्या केबिनमध्ये सत्य उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्याकडे एक तरुण नोकरी मागायला

Ajit Pawar: छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशनतर्फे लंडन येथे अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभा

लंडन: छत्रपती शिवाजी महाराज युवक संघठना तर्फे आज लंडन येथे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार