आताची सर्वात मोठी बातमी: महाराष्ट्रातील १९१४२ कोटींच्या ग्रीनफिल्ड नाशिक- सोलापूर- अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्र सरकारची मान्यता

मुंबई: युनियन कॅबिनेट मंत्रालयाने झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील १९१४२ कोटींच्या सहापदरी ग्रीनफिल्ड हायवे प्रकल्पाला मान्यता दिली आहे. नाशिक- सोलापूर- अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्र सरकारने मान्यता दिल्याने महाराष्ट्रातील या विशाल प्रकल्पाला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. १९१४२ कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पात नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर अशा महत्वाच्या शहरांना सहजपणे कनेक्टिव्हिटी वाढवणे शक्य होणार आहे. माहितीनुसार या प्रकल्पामुळे तब्बल प्रवासाचे १७ तास वाचणे प्रवाशांना शक्य होईल. पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत मिळालेल्या या मंजुरीमुळे नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव या जिल्ह्यातील पायाभूत सुविधेत मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम होणे अपेक्षित आहे. या रस्त्यामुळे बदललेल्या कनेक्टिव्हिटीसह या शहरांचा कायापालट होणे शक्य होईल.


६ पदरी असलेल्या या महामार्गावर ६० किलोमीटर सरासरी वेग मर्यादा वाहनांना मिळू शकते तर एकूण डिझाईन वेग १०० किलोमीटर प्रति तास असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रस्तावित प्रकल्पात १७ तासांचा प्रवास वाचणे प्रवाशांना शक्य होणार आहे. नियामकांच्या मते, ३१ तासातील ४५% प्रवास वाचेल. सरकारच्या माहितीनुसार, या प्रकल्पामुळे २५१.०६ लाख पातळीवर रोजगार निर्मितीची व अप्रत्यक्षपणे ३१३.८३ लाखांची रोजगार निर्मिती शक्य होणार आहे. महाराष्ट्रातून जात असलेल्या या प्रकल्पातून पश्चिम भारताला दक्षिण भारताशी जोडले जाईल. हा प्रकल्प नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव या जिल्ह्यातून जाणार आहे. बीओटी (Build Operate Transfer) प्रणालीतून हा प्रकल्प उभा राहिल अशी प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे. यामध्ये खाजगी गुंतवणूक देखील असणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की, नवीन महामार्ग बांधण्याचा आणि विद्यमान महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय लॉजिस्टिक्सला चालना देईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करेल. मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात १९१४२ कोटी रुपये एकूण भांडवली खर्चासह सहा-पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरच्या बांधकामाला मंजुरी दिली. एका अधिकृत निवेदनानुसार, 'हा ३७४ किलोमीटर लांबीचा प्रकल्प बीओटी (टोल) पद्धतीने बांधला जाईल. हा प्रकल्प नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या प्रादेशिक शहरांना जोडेल आणि पुढे कुर्नूलपर्यंत कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, असे त्यात म्हटले आहे. ही पायाभूत सुविधा पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या तत्त्वांतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे' असेही त्यात नमूद केले आहे.


केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक आणि सोलापूर दरम्यान नवीन सहा-पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला आणि ओडिशामधील NH-326 च्या रुंदीकरण व बळकटीकरणाला मंजुरी दिल्यानंतर पंतप्रधानांनी एक्स'वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की,'विकासासाठी पुढील पिढीच्या पायाभूत सुविधांचे निर्माण.' पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की,'मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील ६-पदरी नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. पीएम गतिशक्तीशी संरेखित असलेला हा परिवर्तनकारी प्रकल्प प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल, पश्चिम ते पूर्व कनेक्टिव्हिटी मजबूत करेल, लॉजिस्टिक्सला चालना देईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करेल, ज्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल.'

Comments
Add Comment

Petrol-Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मोठा झटका! मुंबईत पेट्रोल १०६ पार, जाणून घ्या नवे दर

मुंबई : देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी शुक्रवार, १५ मेपासून पेट्रोल आणि

Dr. Anand Nadkarni Passes Away : ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी काळाच्या पडद्याआड

मुंबई : मानवी मनाचे गुंतागुंतीचे पेच, मानसिक आजार सर्वसामान्यांना सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगणारे ज्येष्ठ

Mumbai Pydhonie Family Death News : पायधुनी मृत्यूप्रकरणात मोठा खुलासा; डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू झिंक फॉस्फाइडमुळेच!

मुंबई: मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Pune Young woman's number leaked : पुण्यात धक्कादायक प्रकार! हॉटेलच्या QR कोडमधून तरुणीचा नंबर लीक, मध्यरात्री आले वैयक्तिक मेसेज

पुणे: डिजिटल युगात हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेन्यू पाहण्यासाठी QR कोड स्कॅन करणं आता सर्वसामान्य बाब झाली आहे.

Thane Murder Case : ठाण्यात थरारक हत्याकांड; प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला!

ठाणे : उत्तर प्रदेशातील मेरठ ड्रम हत्याकांडासारखीच एक धक्कादायक घटना ठाण्यातील मुंब्रा परिसरात समोर आली आहे.

तिलक वर्मा चमकला, मुंबईने सामना जिंकला; पंजाबचा पाचवा पराभव

धरमशाला : आयपीएल २०२६ मधील ५८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर ६ गडी