मालाड दिंडोशीतील उबाठाच्या ५उमेदवारांच्या अर्जांवर शिवसेनेचा आक्षेप अर्ज होऊ शकतात बाद?

मुंबई : मुंबईत राज ठाकरेंचा हात हातात आल्यावर हुरळून गेलेल्या उबाठाला आता प्रत्यक्ष प्रचारा आधीच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दिंडोशी विधानसभेतील प्रभागामध्ये उबाठाच्या उमेदवारांच्या अर्जांवर शिवसेनेने आक्षेप नोंदवला आहे. निवडणूक प्रक्रियेतील नियमानुसार पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना देण्यात येणाऱ्या एबी फॉर्मवर स्व हस्ताक्षरातील स्वाक्षरी असणे आवश्यक असते. परंतु उबाठाच्या उमेदवारांना देण्यात आलेल्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेने या अर्जांवर आक्षेप नोंदवला आहे . या आक्षेपानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. असे मात्र या आक्षेपामुळे उबाठा उमेदवारांच्या गोटात एकच खळबळ माजलेली आहे.


उबाठा शिवसेनेच्या वतीने दिंडोशी विधानसभेतील प्रभाग क्रमांक ३८, ३९, ४०, ४१ आणि ४२ प्रभागाचे अर्ज मालाड पूर्वेतील उत्तर पूर्व विभाग निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी दाखल अर्जांची छाननी सुरू असताना शिवसेनेचे विभाग प्रमुख वैभव भरडकर यांनी यावर आक्षेप नोंदवला. उबाठा उमेदवारांना देण्यात आलेल्या अर्जावर डिजिटल स्वाक्षरी असल्याचे भरडकर यांनी हे आक्षेप नोंदवले आहेत.


निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, कोणत्याही पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांना देण्यात येणाऱ्या एबी फॉर्मवर स्व: हस्ताक्षरातील स्वाक्षरी असणे गरजेचे असते.. मात्र, उबाठा उमेदवारांच्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे ठाकरेंच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याची मागणी वैभव भरडकर यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. या संपूर्ण मालाड आणि दिंडोशी भागासह उबाठाने डिजिटल स्वाक्षरी असलेले एबी फॉर्म दिल्याने त्यांचे अर्ज बाद करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली आहे. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात तक्रार स्वीकारून कारवाई करता येईल हे पडताळून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. निवडणूक आयोगाच्या कायद्याचे उल्लंघन झाल्याने हे अर्ज बाद करण्याची गरज असून आम्ही नियमानुसार करायची मागणी करत असल्याचे भरडकर यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि

Health Minister Prakash Abitkar : खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक

अतिरिक्त शुल्क घेतल्यास होणार कारवाई मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून

Strait of Hormuz : ३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली ; तेल, वायू अन् खतांचा जहाजात समावेश, २० हून अधिक जहाजे रांगेत

३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली

Environment Minister Pankaja Munde : प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा;

मुंबई : चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र