मालाड दिंडोशीतील उबाठाच्या ५उमेदवारांच्या अर्जांवर शिवसेनेचा आक्षेप अर्ज होऊ शकतात बाद?

मुंबई : मुंबईत राज ठाकरेंचा हात हातात आल्यावर हुरळून गेलेल्या उबाठाला आता प्रत्यक्ष प्रचारा आधीच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दिंडोशी विधानसभेतील प्रभागामध्ये उबाठाच्या उमेदवारांच्या अर्जांवर शिवसेनेने आक्षेप नोंदवला आहे. निवडणूक प्रक्रियेतील नियमानुसार पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना देण्यात येणाऱ्या एबी फॉर्मवर स्व हस्ताक्षरातील स्वाक्षरी असणे आवश्यक असते. परंतु उबाठाच्या उमेदवारांना देण्यात आलेल्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेने या अर्जांवर आक्षेप नोंदवला आहे . या आक्षेपानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. असे मात्र या आक्षेपामुळे उबाठा उमेदवारांच्या गोटात एकच खळबळ माजलेली आहे.


उबाठा शिवसेनेच्या वतीने दिंडोशी विधानसभेतील प्रभाग क्रमांक ३८, ३९, ४०, ४१ आणि ४२ प्रभागाचे अर्ज मालाड पूर्वेतील उत्तर पूर्व विभाग निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी दाखल अर्जांची छाननी सुरू असताना शिवसेनेचे विभाग प्रमुख वैभव भरडकर यांनी यावर आक्षेप नोंदवला. उबाठा उमेदवारांना देण्यात आलेल्या अर्जावर डिजिटल स्वाक्षरी असल्याचे भरडकर यांनी हे आक्षेप नोंदवले आहेत.


निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, कोणत्याही पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांना देण्यात येणाऱ्या एबी फॉर्मवर स्व: हस्ताक्षरातील स्वाक्षरी असणे गरजेचे असते.. मात्र, उबाठा उमेदवारांच्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे ठाकरेंच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याची मागणी वैभव भरडकर यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. या संपूर्ण मालाड आणि दिंडोशी भागासह उबाठाने डिजिटल स्वाक्षरी असलेले एबी फॉर्म दिल्याने त्यांचे अर्ज बाद करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली आहे. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात तक्रार स्वीकारून कारवाई करता येईल हे पडताळून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. निवडणूक आयोगाच्या कायद्याचे उल्लंघन झाल्याने हे अर्ज बाद करण्याची गरज असून आम्ही नियमानुसार करायची मागणी करत असल्याचे भरडकर यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात अधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या

Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे केंद्र सरकारला पत्र; हवाई वाहतूक मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

कालबद्धरितीने चौकशी पूर्ण करणार मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्री

Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी

एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध कडक पावले; मुख्यालयाकडून कठोर निर्देश

मुंबई :  २५ जानेवारी रोजी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे परळ

Supreme Court On UGC: सर्वोच्च न्यायालयाकडून यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या  म्हणजेच यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती देण्यात आली

मद्यधुंध वाहनचालकाची धडक अन् ३० ते ४० विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला

पुणे : हल्ली वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे अनेक रस्ते अपघाताच्या घटना या घडत आहे. असाच एक धक्कादायक आणि