मालाड दिंडोशीतील उबाठाच्या ५उमेदवारांच्या अर्जांवर शिवसेनेचा आक्षेप अर्ज होऊ शकतात बाद?

मुंबई : मुंबईत राज ठाकरेंचा हात हातात आल्यावर हुरळून गेलेल्या उबाठाला आता प्रत्यक्ष प्रचारा आधीच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दिंडोशी विधानसभेतील प्रभागामध्ये उबाठाच्या उमेदवारांच्या अर्जांवर शिवसेनेने आक्षेप नोंदवला आहे. निवडणूक प्रक्रियेतील नियमानुसार पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना देण्यात येणाऱ्या एबी फॉर्मवर स्व हस्ताक्षरातील स्वाक्षरी असणे आवश्यक असते. परंतु उबाठाच्या उमेदवारांना देण्यात आलेल्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेने या अर्जांवर आक्षेप नोंदवला आहे . या आक्षेपानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. असे मात्र या आक्षेपामुळे उबाठा उमेदवारांच्या गोटात एकच खळबळ माजलेली आहे.


उबाठा शिवसेनेच्या वतीने दिंडोशी विधानसभेतील प्रभाग क्रमांक ३८, ३९, ४०, ४१ आणि ४२ प्रभागाचे अर्ज मालाड पूर्वेतील उत्तर पूर्व विभाग निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी दाखल अर्जांची छाननी सुरू असताना शिवसेनेचे विभाग प्रमुख वैभव भरडकर यांनी यावर आक्षेप नोंदवला. उबाठा उमेदवारांना देण्यात आलेल्या अर्जावर डिजिटल स्वाक्षरी असल्याचे भरडकर यांनी हे आक्षेप नोंदवले आहेत.


निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, कोणत्याही पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांना देण्यात येणाऱ्या एबी फॉर्मवर स्व: हस्ताक्षरातील स्वाक्षरी असणे गरजेचे असते.. मात्र, उबाठा उमेदवारांच्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे ठाकरेंच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याची मागणी वैभव भरडकर यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. या संपूर्ण मालाड आणि दिंडोशी भागासह उबाठाने डिजिटल स्वाक्षरी असलेले एबी फॉर्म दिल्याने त्यांचे अर्ज बाद करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली आहे. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात तक्रार स्वीकारून कारवाई करता येईल हे पडताळून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. निवडणूक आयोगाच्या कायद्याचे उल्लंघन झाल्याने हे अर्ज बाद करण्याची गरज असून आम्ही नियमानुसार करायची मागणी करत असल्याचे भरडकर यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

अर्ज भरल्यापासून उमेदवाराला दैनंदिन खर्चाची नोंद ठेवणे बंधनकारक, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांची माहिती

मुंबई (विशेष प्रतिनिधी): उमेदवारी अर्ज सादर केल्यापासून उमेदवारांनी दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंद ठेवणे

मुंबईत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तब्बल ७०२ मतदान केंद्र

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी एकूण १० हजार २३१ मतदान केंद्रे

BMC News : निवडणूक कामात गैरवर्तणूक, महापालिकेने केले अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ कामकाजात गंभीर स्वरूपाचे गैरवर्तणूक

बिहारच्या रस्ते विकासासाठी २०२६ ठरणार महत्त्वाचे! केंद्र सरकाने दिला महामार्गाला हिरवा कंदील

बिहार: बिहारच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २०२६ हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या

मुंबईत महायुतीमधील बंडोबांना थंड करण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती

अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस; निष्ठावंत कार्यकर्त्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी केले फोन मुंबई :

Pune Fire News : धुराचे लोट आणि फटाक्यांचे स्फोट! पिंपरी-चिंचवडमध्ये गजानन रुग्णालयाखाली अग्नितांडव; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

पुणे : पिंपरी-चिंचवड : औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात आज दुपारी आगीची एक मोठी घटना