कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये रविंद्र चव्हाण यांची विजयी घोडदौड सुरुच; आणखी दोनजण बिनविरोध विजयी

कल्याण: महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवार ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी संपली आहे. आता अर्जांची छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने खातं उघडून दमदार सुरुवात केली आहे. कालपर्यंत भारतीय जनता पार्टीचे अर्थात भाजपचे बिनविरोध हॅट्रीक केली होती. आज भाजपचे आणखी दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये रविंद्र चव्हाण यांच्या विजयाची घोडदौड सुरू असल्याचे बोलले जात आहे.


पॅनल क्रमांक २६ (क) मधून आसावरी केदार नवरे, पॅनल क्रमांक १८ (अ) मधून रेखा चौधरी, पॅनल क्रमांक २६ बी मधून रंजना मितेश पेणकर या तीन उमेदवारांच्या विजयामुळे डोंबिवलीमध्ये काल विजयाची हॅट्रीक झाली. आजही दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचे पारडे जड झाले आहे. कल्याण डोंबिवलीच्या पॅनल २७ (अ) मधून मंदा सुभाष पाटील आणि क्रमांक २४ (ब) मधून ज्योती पवन पाटील यांचा बिनविरोध विजय झाला आहे.



कल्याण-डोंबिवलीत यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. मात्र समीकरणे बदलली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महायुती म्हणून शिवसेना ६६ आणि भाजप ५६ जागांवर लढत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस ४२ जागांवर स्वबळावर लढत आहे. मनसे आणि उबाठाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे ५४ तर उबाठा ६८ जागांवर निवडणूक लढवत आहे. यासर्व जागांपैकी ५ जागांवर आतापर्यंत भाजपने बिनविरोध विजय मिळवला आहे.

Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा