कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये रविंद्र चव्हाण यांची विजयी घोडदौड सुरुच; आणखी दोनजण बिनविरोध विजयी

कल्याण: महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवार ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी संपली आहे. आता अर्जांची छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने खातं उघडून दमदार सुरुवात केली आहे. कालपर्यंत भारतीय जनता पार्टीचे अर्थात भाजपचे बिनविरोध हॅट्रीक केली होती. आज भाजपचे आणखी दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये रविंद्र चव्हाण यांच्या विजयाची घोडदौड सुरू असल्याचे बोलले जात आहे.


पॅनल क्रमांक २६ (क) मधून आसावरी केदार नवरे, पॅनल क्रमांक १८ (अ) मधून रेखा चौधरी, पॅनल क्रमांक २६ बी मधून रंजना मितेश पेणकर या तीन उमेदवारांच्या विजयामुळे डोंबिवलीमध्ये काल विजयाची हॅट्रीक झाली. आजही दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचे पारडे जड झाले आहे. कल्याण डोंबिवलीच्या पॅनल २७ (अ) मधून मंदा सुभाष पाटील आणि क्रमांक २४ (ब) मधून ज्योती पवन पाटील यांचा बिनविरोध विजय झाला आहे.



कल्याण-डोंबिवलीत यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. मात्र समीकरणे बदलली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महायुती म्हणून शिवसेना ६६ आणि भाजप ५६ जागांवर लढत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस ४२ जागांवर स्वबळावर लढत आहे. मनसे आणि उबाठाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे ५४ तर उबाठा ६८ जागांवर निवडणूक लढवत आहे. यासर्व जागांपैकी ५ जागांवर आतापर्यंत भाजपने बिनविरोध विजय मिळवला आहे.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती