दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास


इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या इंदूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर या दूषित पाण्यामुळे ११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास होत आहे. इंदूर शहरामध्ये नर्मदा नदीमधून येणारे पाणी हे आजार आणि मृत्यूचे कारण ठरत असल्याचे समोर आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने प्रभावित भागातील पाणीपुरवठा बंद केला आहे. जलवाहिनीची दुरुस्ती केली जात असून, टँकरमधून स्वच्छ पाणी पुरवले जात आहे. आरोग्य विभागाची पथके घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करत आहे.


दूषित पाणीपुरवठ्यामुळे ही घटना घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने त्वरित तपास सुरू केला. त्यानंतर भागिरथपुरा पोलीस चौकीच्या टॉयलेटखालून जाणाऱ्या नर्मदेच्या जलवाहिनीला गळती लागली होती. या गळतीमुळे दूषित पाणी जलवाहिनीमध्ये मिसळत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संपूर्ण प्रभागात दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. हे दूषित पाणी पिऊन लोक आजारी पडत होते. दूषित पाण्याचे प्राशन केल्याने तब्येत बिघडून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याने इंदूरमधील भागिरथपूरामध्ये खळबळ उडाली आहे.


गेल्या काही दिवसांपासून नर्मदा नदीच्या पाण्याचा वापर करू नका, असे आवाहन करणाऱ्या पोस्ट येथील सोशल मीडियावरून लोक शेअर करत होते. मात्र लोकांच्या तक्रारींकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले.

Comments
Add Comment

हॉटेलमध्ये पतीला प्रेयसीसोबत रंगेहात पकडलं; संतापलेल्या पत्नीने भररस्त्यात केला गोंधळ, व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विवाहित तरुण,

लेह-लडाखचा प्रवास ठरला अखेरचा; युवा क्रिकेटपटू अनिकेत काळे यांच्यासह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू

महाराष्ट्रातील क्रिकेट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे युवा क्रिकेटपटू अनिकेत काळे (Aniket kale) यांचे भीषण

Divyastra Mk-1 : स्वदेशी ‘दिव्यास्त्र एमके-१’ लोइटरिंग म्युनिशनचे यशस्वी परीक्षण

भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान परिसंस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत हॉव्हरिट

Accident News : लग्नाला निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Accident News : उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ महामार्गावर फतेहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. या

Brahmos Missile Deal : ब्रह्मोस क्षेपणास्त्रावर भारताची मोठी झेप! व्हिएतनामनंतर इंडोनेशियाही खरेदीसाठी उत्सुक

नवी दिल्ली : भारताच्या अत्याधुनिक आणि जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या

JEE Advanced 2026 Result : शुभम कुमार देशात अव्वल; मुलींमध्ये आरोही देशपांडे ठरली टॉपर!

नवी दिल्ली : जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ (JEE Advanced 2026) परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. यंदा आयआयटी दिल्ली