मुंबईत मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के; लवकरच त्यांची लोकसंख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढणार

किरीट सोमय्यांचा दावा; मुंबईला मुस्लिम करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप


मुंबई: "मुंबईत हिंदूंचा जन्मदर १.३ टक्के तर मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के म्हणजे दुप्पट आहे. त्यामुळे २०५० मध्ये हिंदू ५४ टक्क्यांखाली आणि मुस्लीम लोकसंख्या ३० टक्क्यांवर जाईल", असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी केला. मुंबईला मुस्लिम करण्याचा डाव सुरू असून, मुंबईकर मतदार ते कदापी होऊ देणार नाही, असे सोमय्या म्हणाले.


मुंबईतील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोमय्या म्हणाले, "मराठी मुंबई आता मुस्लीम मुंबई झाली आहे. हे किरीट सोमय्या किंवा अमित शाह नव्हे, तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्ट सांगत आहे. २०५० मध्ये हिंदू ५४ टक्क्यांखाली आणि मुस्लीम ३० टक्क्यांच्या वर जाईल. मुंबईत हिंदूंचा जन्मदर १.३ टक्के तर मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के म्हणजे दुप्पट आहे. उबाठाचा सहकारी एमआयएम पक्ष सांगतो, मुंबईचा महापौर खान, पठाण किंवा बुरखावाली असावी हे आमचे लक्ष्य आहे. ठाकरे बंधू यावर एक शब्द बोलत नाहीत. मुंबईत बांगलादेशींचे अतिक्रमण इतक्या मोठ्या संख्येने होत आहे, त्यावर चाकर शब्द काढत नाहीत. माफिया कंत्राटदारांकडून तुम्हाला पैसे मिळतात म्हणून 'मुस्लीम मुंबई' बनवण्याचं कटकारस्थान एमआयएम आणि ठाकरे बंधूकडून होत असेल. परंतु हे महायुती यशस्वी होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.


"आता मोठ्या ठाकरेंसोबत छोटे ठाकरे एकत्र आले आहेत. मराठी मुंबई म्हणायचे आणि मुस्लीम मुंबई करण्याच्या कारस्थानात सहभागी व्हायचे! माझ्याकडे जनगणनेचे आकडे आहेत. १९४७ मध्ये जेव्हा देशाचे विभाजन झाले तेव्हा मुंबईत मुस्लिमांची संख्या ८.८ टक्के होती आणि आता हाच आकडा २०११ साली २०.६८ टक्के इतका वाढला आहे. २०२५ मध्ये मुंबईत मुस्लीम लोकसंख्या २४.९८ टक्के आहे. त्या जीवावर उबाठाने लोकसभेला व्होट जिहाद केले. धारावीत त्यांनी २५ हजार मुस्लिमांचे नेतृत्व करत अनधिकृत मशि‍दीसाठी पुढाकार घेतला", असा आरोप सोमय्या यांनी केला.




उबाठाने मुस्लिमांची शरणागती स्वीकारली


 

१९९२ साली बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या हिंदुत्ववादी नेतृत्वामुळे मुंबई वाचली. मात्र उबाठाने मुस्लिमांची शरणागती स्वीकारली आहे. उत्तर भारतीय असो, गुजराती, राजस्थानी असो, हिंदू हा हिंदू आहे. उबाठाला मुंबईत महापौर नकोय, तर महापालिकेतील माफिया कंत्राटदारावर त्यांचे नेतृत्व हवे आहे. भाजपचे लक्ष्य मुंबईचा विकास करायचा आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

Comments
Add Comment

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह