आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार


मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या बुधवारी, ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्यांना इच्छितस्थळी जाणेयेणे सुकर व्हावे यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) बुधवार, ३१ डिसेंबर रोजी 'मेट्रो १' मार्गिकेवरील सेवा कालावधीत वाढ केली आहे. या मार्गिकेवर बुधवारी मेट्रोच्या २८ फेऱ्या वाढविण्यात आल्या असून 'मेट्रो १' मार्गिकेवर बुधवारी मध्यरात्री २.४५ पर्यंत मेट्रो गाड्या धावणार असल्याचे एमएमओपीएलच्यावतीने सांगण्यात आले आहे.


दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने रात्री घराबाहेर पडतात. मुंबईतील समुद्र किनारे, पर्यटन स्थळे आणि इतर ठिकाणी मुंबकरांची प्रचंड गर्दी होते. नागरिकांना इच्छितस्थळी पोहचणे आणि घरी परतणे सोपे व्हावे यासाठी एमएमओसीएलने बुधवार, ३१ जानेवारी रोजी 'मेट्रो १' मार्गिकेवरील फेऱ्या, तसेच सेवा कालावधीत वाढ केली आहे. 'मेट्रो १' मार्गिकेवरील पहिली मेट्रो सकाळी ५.३० वाजता वर्सोवा आणि घाटकोपर येथून सुटते. तर शेवटची गाडी घाटकोपरवरून रात्री ११.५२ वाजता, तर वर्सोव्यावरून रात्री ११.२६ वाजता सुटते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारा जल्लोष लक्षात घेता बुधवार, ३१ जानेवारी रोजी पहिली गाडी सकाळी ५.३० वाजता घाटकोपर आणि वर्सोव्यावरून सुटणार असून सेवा कालावधीत वाढ करण्यात आल्याने वर्सोव्यावरून शेवटची गाडी बुधवारी मध्यरात्री २.१४ वाजता सुटणार असल्याची माहिती एमएमओसीएलने दिली. तर घाटकोपरवरून शेवटची गाडी बुधवारी मध्यरात्री २.४० वाजता सुटणार आहे. 'मेट्रो १' मार्गिकेवर दररोज नियमित ४७६ फेऱ्या होतात. पण या मार्गिकेवरील बुधवारी २८ फेऱ्या वाढणार असून फेऱ्यांची संख्या ५०४ इतकी असेल. बुधवारी गर्दीच्या वेळी दर ३ मिनिट २० सेकेंदांनी, तर गर्दी नसताना दर ५ मिनिट ५५ सेकेंदांनी मेट्रो गाड्या धावणार आहेत. तर बुधवारी मध्यरात्री १२ नंतर सुटणाऱ्या गाड्या दर १२ मिनिटांनी धावणार असल्याचेही एमएमओसीएलकडून सांगण्यात आले. नव वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी ही बाब दिलासादायक असणार आहे. दरम्यान, लोकल, बेस्ट बसच्या विशेष फेऱ्या ३१ जानेवारी रोजी धावणार आहेत. 'आरे – कफ परेड भुयारी मेट्रो ३' मार्गिका दिवस-रात्र धावणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे.

Comments
Add Comment

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता 'मकोका' लागणार!

गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी; बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी संयुक्त भरारी पथके आणि सीमांवर

वरिष्ठांनी भाजपसोबत जायचे ठरवल्यास दुसरा पर्याय निवडेन!

आ. रोहित पवार यांचा दावा; आजोबा आणि आत्याला दिला इशारा मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय

एकनाथ शिंदेंकडून २०२९ साठी स्वबळाची चाचपणी?

२०० मतदारसंघात संघटनात्मक बांधणी सुरू; मंत्री उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी मुंबई :