आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार


मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या बुधवारी, ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्यांना इच्छितस्थळी जाणेयेणे सुकर व्हावे यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) बुधवार, ३१ डिसेंबर रोजी 'मेट्रो १' मार्गिकेवरील सेवा कालावधीत वाढ केली आहे. या मार्गिकेवर बुधवारी मेट्रोच्या २८ फेऱ्या वाढविण्यात आल्या असून 'मेट्रो १' मार्गिकेवर बुधवारी मध्यरात्री २.४५ पर्यंत मेट्रो गाड्या धावणार असल्याचे एमएमओपीएलच्यावतीने सांगण्यात आले आहे.


दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने रात्री घराबाहेर पडतात. मुंबईतील समुद्र किनारे, पर्यटन स्थळे आणि इतर ठिकाणी मुंबकरांची प्रचंड गर्दी होते. नागरिकांना इच्छितस्थळी पोहचणे आणि घरी परतणे सोपे व्हावे यासाठी एमएमओसीएलने बुधवार, ३१ जानेवारी रोजी 'मेट्रो १' मार्गिकेवरील फेऱ्या, तसेच सेवा कालावधीत वाढ केली आहे. 'मेट्रो १' मार्गिकेवरील पहिली मेट्रो सकाळी ५.३० वाजता वर्सोवा आणि घाटकोपर येथून सुटते. तर शेवटची गाडी घाटकोपरवरून रात्री ११.५२ वाजता, तर वर्सोव्यावरून रात्री ११.२६ वाजता सुटते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारा जल्लोष लक्षात घेता बुधवार, ३१ जानेवारी रोजी पहिली गाडी सकाळी ५.३० वाजता घाटकोपर आणि वर्सोव्यावरून सुटणार असून सेवा कालावधीत वाढ करण्यात आल्याने वर्सोव्यावरून शेवटची गाडी बुधवारी मध्यरात्री २.१४ वाजता सुटणार असल्याची माहिती एमएमओसीएलने दिली. तर घाटकोपरवरून शेवटची गाडी बुधवारी मध्यरात्री २.४० वाजता सुटणार आहे. 'मेट्रो १' मार्गिकेवर दररोज नियमित ४७६ फेऱ्या होतात. पण या मार्गिकेवरील बुधवारी २८ फेऱ्या वाढणार असून फेऱ्यांची संख्या ५०४ इतकी असेल. बुधवारी गर्दीच्या वेळी दर ३ मिनिट २० सेकेंदांनी, तर गर्दी नसताना दर ५ मिनिट ५५ सेकेंदांनी मेट्रो गाड्या धावणार आहेत. तर बुधवारी मध्यरात्री १२ नंतर सुटणाऱ्या गाड्या दर १२ मिनिटांनी धावणार असल्याचेही एमएमओसीएलकडून सांगण्यात आले. नव वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी ही बाब दिलासादायक असणार आहे. दरम्यान, लोकल, बेस्ट बसच्या विशेष फेऱ्या ३१ जानेवारी रोजी धावणार आहेत. 'आरे – कफ परेड भुयारी मेट्रो ३' मार्गिका दिवस-रात्र धावणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,