निवणुकीपूर्वीच महायुतीला झटका: वॉर्डातून २ उमेदवार बाद

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला मतदानाआधीच मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक २११ आणि २१२ या दोन महत्त्वाच्या प्रभागांत महायुतीचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने या दोन्ही जागा अक्षरशः हातातून निसटल्या आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाद झाल्यामुळे या वॉर्डमध्ये महायुतीला माघार घ्यावी लागली असून, याचा थेट फायदा विरोधी पक्षांना होणार आहे.


वॉर्ड क्रमांक २११ मध्ये भाजपने शकील अन्सारी यांना उमेदवारी दिली होती. हा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील असल्याने भाजपने येथे विशेष तयारी केली होती. मात्र उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे पूर्ण न झाल्याने निवडणूक आयोगाच्या छाननीत त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. परिणामी या प्रभागात कमळ किंवा धनुष्यबाण हे चिन्ह मतदारांना दिसणार नाही.


दरम्यान, वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये घडलेल्या घटनेने महायुतीची अडचण अधिकच वाढवली. या वॉर्डमधून भाजपच्या मंदाकिनी खामकर यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांना पक्षाचा एबी फॉर्मही मिळाला होता. मात्र अर्ज दाखल करण्यासाठी त्या निवडणूक कार्यालयात १५ मिनिटे उशिरा पोहोचल्या. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार वेळ संपल्यानंतर अर्ज स्वीकारला जात नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज थेट बाद ठरवण्यात आला.


मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक वॉर्ड निर्णायक ठरणार असताना, दोन प्रभागांमध्ये उमेदवारच नसणे ही महायुतीसाठी नामुष्की मानली जात आहे.आता या दोन वॉर्डमधील महायुतीचे मतदार कोणत्या दिशेने मतदान करतात आणि त्याचा फायदा कोणाला होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Iran-US-Israel War : इराणचा मोठा दावा! अमेरिकेच्या शक्तिशाली ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा आरोप

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने मोठा दावा करत सांगितले आहे की, त्यांनी

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर