नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट'


घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट


जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या स्वागताच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.काश्मीरच्या संपूर्ण प्रदेशात पोलीस, केंद्रीय सुरक्षा बल (सीआरपीएफ) आणि सैन्याच्या संयुक्त पथकांनी पाहणी सुरू केली असून सुरक्षा वाढविण्यासाठी उच्च अलर्ट लागू करण्यात आला आहे. सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन जम्मू-कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी एरिया डोमिनेशन व सर्च ऑपरेशन्स अधिक गतिमान केले आहेत.


श्रीनगरसह घाटीतील संवेदनशील भागांमध्ये स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी ) सह समन्वय साधून तलाशी अभियान जोरात चालू आहे. पोलिसांनी संशयित ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारीची मालिका सुरू केली असून शहरी भागात चेकपॉइंट्स लावून तिथे तपासणी सुरू आहे. नववर्षाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवरही सुरक्षा वाढवण्यात आली. गुलमर्ग, पहलगाम आणि श्रीनगर येथे पर्यटकांची गर्दी असून डल लेक आणि आसपासच्या परिसरात पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने