मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा १ जानेवारीपासून बदलणार


मुंबई : नव्या वर्षात रेल्वेने एक - दोन दिवसांसाठी फिरायला जाण्याची योजना असेल तर आधी हे वाचा. कारण मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा १ जानेवारी २०२६ पासून बदलणार आहेत. मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.


रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार असलेल्या रेल्वे वेळापत्रकामुळे मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांच्या वेळेत पाच ते पंधरा मिनिटांचा फरक पडणार आहे. अनेक गाड्यांच्या वेळा अलीकडे किंवा पलीकडे करण्यात आल्या आहेत.


मुंबई-पुणे-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या मार्गावर धावणाऱ्या 'वंदे भारत एक्सप्रेस'च्या वेळापत्रकात काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि तांत्रिक सुधारणांमुळे हा बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना नव्या वेळेनुसार प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.


वंदे भारत एक्सप्रेस, इंटरसिटी, सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन या प्रमुख गाड्यांच्या वेळांमध्ये थोडा बदल होणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या मुंबईत सकाळी पोहोचतात किंवा रात्री सुटतात, त्यांच्या प्लॅटफॉर्म आणि वेळेत रेल्वेने बदल केला आहे. हे बदल जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी प्रवासाला निघण्याआधी 'NTES' (National Train Enquiry System) या ॲपवर किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्या गाडीचे लाईव्ह स्टेटस तपासावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. वेळापत्रकातील बदल हा रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठीच असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.


Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन