३७ प्रकल्पांना पावणेदोन कोटींचा दंड

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई!


मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी आणि प्रदूषणविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) विशेष मोहीम हाती घेतली आहे.


शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांची अचानक तपासणी केल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ प्रकल्पांकडून १.८७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर चार प्रकल्पांवर टाळे ठोकण्यात आले. एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईतील वायू प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच विशेष बैठक पार पडली. यावेळी, मुंबईसाठी चार आणि नवी मुंबईसाठी दोन विशेष तपास पथके तातडीने कार्यान्वित करण्याचे ठरवण्यात आले.


मोबाईल व्हॅनद्वारे पाहणी


मुंबई महानगर क्षेत्रात हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी एकूण ३२ केंद्रे कार्यरत असून, त्यापैकी १४ केंद्रे मुंबई शहरात आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता ढासळते, तिथे तत्काळ मोजमाप करण्यासाठी २२ मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि