३७ प्रकल्पांना पावणेदोन कोटींचा दंड

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई!


मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी आणि प्रदूषणविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) विशेष मोहीम हाती घेतली आहे.


शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांची अचानक तपासणी केल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ प्रकल्पांकडून १.८७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर चार प्रकल्पांवर टाळे ठोकण्यात आले. एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईतील वायू प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच विशेष बैठक पार पडली. यावेळी, मुंबईसाठी चार आणि नवी मुंबईसाठी दोन विशेष तपास पथके तातडीने कार्यान्वित करण्याचे ठरवण्यात आले.


मोबाईल व्हॅनद्वारे पाहणी


मुंबई महानगर क्षेत्रात हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी एकूण ३२ केंद्रे कार्यरत असून, त्यापैकी १४ केंद्रे मुंबई शहरात आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता ढासळते, तिथे तत्काळ मोजमाप करण्यासाठी २२ मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

'निडर नारी' वॉकेथॉन

मुंबई: एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर (एमओसी विलेपार्ले) ने त्यांच्या निडर नारी उपक्रमाचा भाग म्हणून १ मार्च

चैत्र चाहूल २०२६ चे 'ध्यास' आणि रंगकर्मी सन्मान

मुंबई : गेली दोन दशके गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर “चैत्र चाहूल” हा मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला वाहिलेला

एलपीजी सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करा, महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश

मुंबई : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल हे दोन देश इराण विरुद्ध लढत आहे. या युद्धाने आता १२ व्या दिवसांत प्रवेश

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍पातील जुळ्या बोगद्याच्‍या खोदकामासाठी बोगदा खनन संयंत्राचे सुटे भाग 'शाफ्ट'मध्ये उतरवण्याची प्रक्रिया सुरू

मुंबई: गोरेगाव -मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

मराठी शाळांमधील गळती रोखण्यासाठी महापालिका शिक्षण समितीची अनोखी मागणी

मुंबई: महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या

प्रत्येक मेट्रो रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या क्षमतेचे पंप; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई: यंदाच्या पावसाळ्या दरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा अधिकाधिक जलद गतीने व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या