उबाठा – मनसेचे मुंबईत बारा वाजणार, भाजपचा घणाघात

मुंबई : उबाठा गट, संजय राऊत यांच्यापाठोपाठ मनसे कडूनही हिरव्या मतांसाठी लांगुलचालन चालू झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत या उबाठा - मनसेच्या तथाकथित आघाडीचे बारा वाजणार अशी बोचरी टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. जे स्वत: राहुल गांधी यांचे तळवे चाटतात, सोनिया गांधी यांची गुलामी करतात ते आज शिवसेनेवर बूट चाटण्याची टीका करतात हे हास्यास्पद आहे. दुस-यांवर टीका करण्याआधी जरा आरशात पहा असा खोचक सल्लाही त्यांनी संजय राऊतांना दिला. ⁠


थैलीचे राजकारण कोण करते हे जनतेला माहीत आहे. संजय राऊत हेच अशा राजकारणात दंग असतात. थैल्या भरणाऱ्या आणि तिजोरी भरणाऱ्यांचा हिशोब जनतेला उत्तमपणे माहिती आहे. ⁠पत्राचाळ घोटाळ्यासह इतर घोटाळ्यांचा हिशोब द्या असे आव्हान बन यांनी दिले. सच्च्या कार्यकर्त्याला डावलून उमेदवारी न देता भावाला उमेदवारी देऊन घराणेशाहीचे राजकारण राऊत करतात असे शरसंधानही त्यांनी केले. उद्धव ठाकरे आता पहाटे चारपर्यंत जागून काही जनतेवर उपकार करत नाही आहेत. मुख्यमंत्री होते तेव्हा झोपा काढत होते आणि फेसबुक लाइव्ह करण्यात धन्यता मानत होते असा प्रहार बन यांनी केला.



भाजपा गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही


नवाब मलिक मुंबई महापालिका निवडणुकीत नेतृत्व करणार असतील भाजपा साथ देणार नाही हे पक्षाने आधीच स्पष्ट केले आहे याचा पुनरुच्चार करत बन म्हणाले की, कोणत्याही गुन्हेगाराच्या पाठीशी भाजपा उभी राहत नाही. ⁠मुंबईचा विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करू शकतात आणि जनतेचा पाठिंबाही भाजपा- शिंदे शिवसेनेला मिळणार आहे.



सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान राखणारी भाजपा


भाजपामध्ये एका विशिष्ट घराण्यात जन्माला आले तरच उमेदवारी किंवा संधी मिळते असे नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उचित संधी नेहमी दिली जाते. “माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मानखुर्द प्रभाग क्रमांक 135 ची उमेदवारी दिल्याबद्दल भाजपाचे मनापासून आभार” या शब्दांत बन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मानखुर्दची जनता भाजपाच्या विकासाच्या राजकारणाच्या बाजूने उभी राहील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

Comments
Add Comment

Marine Technology : आधुनिक सागरी तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणणार; मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यातील सागरी वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने

Nitesh Rane : मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या, मंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या

Pandharpur : पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी

Heatstroke : अतिउष्णतेच्या संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम उपाययोजना करणार

मुंबई : हवामान बदल या संकटाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला, विशेषतः अल्प भूधारक शेतकऱ्यांना बसत आहे

Tarapur MIDC : तारापूर औद्योगिक क्षेत्रात चाललंय काय ? अहवाल सादर करण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकाराबद्दल औद्योगिक भूखंडाची

Youth : ‘युवकांमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य