एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले आहेत. आता एका प्रश्नासाठी पाच पर्याय उमेदवारांना दिले जाणार आहेत. यापैकी कोणताही एका पर्यायाचे वर्तुळ रंगविणे बंधनकारक असेल. असे न केल्यास प्रत्येक उत्तरासाठी २५ टक्के गुण कापले जाणार आहेत. एक मार्च २०२६ नंतर होणाऱ्या परीक्षांपासून हे बदल लागू असणार आहेत. ‘एमपीएससी’ मार्फत नुकतीच याबाबतची सूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना उत्तरपत्रिकेबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आयोगामार्फत उत्तरपत्रिका दोन भागात विभागण्यात आली आहे. भाग १ आणि भाग २ अशी ही उत्तरपत्रिका असणार आहे. भाग १ हा केवळ प्रश्नांची उत्तरे नोंदविण्यासाठी असून, भाग २ मध्ये उमेदवाराच्या नावासह बैठक क्रमांक, विषय सांकेतांक प्रश्नपत्रिका क्रमांक तसेच स्वाक्षरी असा तपशील असणार आहे. परीक्षा संपल्यानंतर पर्यवेक्षकांमार्फत भाग १ व २ वेगवेगळे केले जाणार आहेत. यामुळे उत्तरपत्रिका मूल्यमापनाबद्दल गोपनीयता राखली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच आता प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चारऐवजी पाच पर्याय दिले जाणार आहेत. उत्तराचे चार पर्याय व उत्तर येत नसेल तर पाचवा पर्याय, असे हे पाच पर्याय असणार आहेत. चारपैकी कोणताच पर्याय निवडायचा नसल्यास, उमेदवाराला पाचव्या पर्यायाचे वर्तुळ रंगवावे लागणार आहे. पाचपैकी एकही वर्तुळ रंगवलेले नसल्यास, त्या प्रश्नासाठी २५ टक्के गुण कापले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना आता उत्तराचा पर्याय रंगविणे बंधनकारक आहे.




  1. कोणताही एका पर्यायाचे वर्तुळ रंगविणे बंधनकारक

  2. तसे न केल्यास प्रत्येक उत्तरासाठी २५ टक्के गुण कापले जाणार

  3. १ मार्च २०२६ नंतर होणाऱ्या परीक्षांपासून हे बदल लागू होणार


उत्तरपत्रिका अवैध


आयोगामार्फत अजूनही काही नियम जाहीर करण्यात आले आहेत. उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरी केलेली नसल्यास तसेच काळ्या बॉल पाईंट पेनव्यतिरीक्त इतर पेन वापरल्यास, उत्तरपत्रिकेवर अनावश्यक मजकूर, चिन्हे, अन्य माहिती नमूद केल्यास उत्तरपत्रिका अवैध ठरविली जाणार आहे.

Comments
Add Comment

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या

Mumbai Tree Collapse : वादळ आणि पावसात उन्मळून पडणाऱ्या झाडांचे जोखीम मूल्यांकन सुरू

मुंबई : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई

Chandrashekhar Bawankule : ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या मालमत्तांची तपासणी होणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

- राज्यव्यापी तपासणीचा तीन महिन्यांत अहवाल देणार मुंबई : इंग्रजकालीन ख्रिश्चन मिशनरी संस्थांनी राज्यात मागे