नवी मुंबई विमानतळावरून अहमदाबादपर्यंत थेट उड्डाण

३१ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू


नवी मुंबई : अकासा एअर या विमान कंपनीकडून ३१ डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते गुजरातच्या अहमदाबाददरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा आठवड्यातून एकदा चालविण्यात येणार आहे.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानांची ये-जा २५ डिसेंबरपासून सुरू झाली असून, प्रवासी सेवेत आल्यानंतर अकासा एअरने या विमानतळाला अहमदाबादशी थेट जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या लाँचमुळे ग्रीनफील्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सेवा सुरू करणाऱ्या प्रारंभीच्या विमान कंपन्यांपैकी अकासा एअर एक ठरली आहे. या मार्गावरील फ्लाइट क्रमांक क्यूपी १९१६ दर बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळी ५.४० वाजता रवाना होऊन सायंकाळी ६.५० वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर या मार्गावरील विमानसेवेची वारंवारता वाढविण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या थेट सेवेचा लाभ व्यावसायिक प्रवासी तसेच गुजरात–महाराष्ट्रदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी कनेक्टिव्हिटीला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

महापालिका निकालानंतर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य - शहराध्यक्ष बदला; भाई जगताप यांनी केली वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत २४ जागा राखून सर्वांनाच धक्का देणाऱ्या काँग्रेसमध्ये नवे नाराजीनाट्य सुरू

विप्रो कंपनीचा तिमाही निकाल कमकुवत? ७% नफ्यात घसरण तरीही 'इतका' लाभांश जाहीर

मोहित सोमण: प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रो (Wipro Limited) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ विजयी उमेदवार

प्रभाग क्र. १ अ) अरुणा शंकर शिंदे, (शिवसेना शिंदे) ब) चांदनी चौगुले (शिवसेना शिंदे) क) जगदीश गवते (शिवसेना शिंदे) ड)

नवी मुंबई महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत

१११ पैकी ६६ जागांवर भाजप विजयी नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत स्पष्ट आघाडी

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं आणि वर्तमानात पाहावं.….. - भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई :  संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी जे रक्त सांडले, त्या आंदोलनावर गोळ्या झाडण्याचं पाप