नवी मुंबईत ‘भगत’ कुटुंबातील उमेदवारीवरून वाद

नवी मुंबईत ‘भगत’कुटुंबातील उमेदवारीवरून वाद


नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. एकाच घरातील व्यक्तींना तीन ते चार, तर काही ठिकाणी चार ते पाच जागांची उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संघाशी संबंधित नेत्यांनी केला आहे.


निवडणुकांचे बिगूल वाजले असून काही पक्षांनी उमेदवार निश्चित करून प्रचारालाही सुरुवात केली आहे. नवी मुंबईत भाजपच्या अंतर्गत गोटात उमेदवारीवरून अस्वस्थता वाढताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक १८ मध्ये एकाच कुटुंबाला एकापेक्षा अधिक तिकीट देण्याच्या हालचालींमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.


यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना एका भाजप पदाधिकाऱ्याने सांगितले की, “२०१४ नंतर देशातील राजकीय वातावरण बदलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचे विचार देशभर पोहोचले. भाजपचे कार्यकर्ते तन-मन-धन अर्पण करून काम करतात. सहा वर्षांत पक्षात प्रवेश केलेल्या काही व्यक्ती चार-चार तिकिटांची मागणी करत आहेत.” या पदाधिकाऱ्यांनी पुढे आरोप केला की, “अयोध्येत राम मंदिर उद्घाटन, कलम ३७० हटविणे, पंतप्रधानांचा वाढदिवस आणि १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविले जाणारे सेवा कार्यक्रम – या कोणत्याही उपक्रमांत संबंधित मंडळींचा सहभाग दिसून आला नाही. पक्षाचे नाव वापरायचे, मात्र पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहायचे.


कार्यकर्त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की प्रभाग क्रमांक १८ मधील दशरथ भगत यांना एकापेक्षा जास्त तिकीट देऊ नये आणि निष्ठावंत, सातत्याने काम करणाऱ्यांना संधी द्यावी. २०१९ मध्ये दशरथ भगत, निशांत भगत आणि संदीप भगत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांच्या बॅनरवर कमळाचे चिन्ह, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा स्थानिक आमदारांचे फोटो लावले नसल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे. पक्षाने योग्य आणि न्याय्य निर्णय घेतला तर उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही मेहनत करू, मात्र तसे न झाल्यास “आम्हाला आमचा मार्ग वेगळा घ्यावा लागेल”, असा सूचक इशाराही काही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Horrific accident in Navi Mumbai : तळोजा येथे भरधाव कारने १० जणांना उडवले; २ जणांचा मृत्यू, ८ गंभीर

नवी मुंबई: नवी मुंबईतील तळोजा परिसरात आज मंगळवारी, ७ जुलै २०२६ रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना

Navi Mumbai : धक्कादायक घटना ! अवघ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

नवी मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सोबत कधी काही होईल सांगता येत नाही. नवी मुंबई(Navi Mumbai) मध्ये एक

Road Development : ३० ते ४० मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटात होणार; कल्याण, शिळफाटा

मुंबई : मुंबईतीळ अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मात्र आता कल्याण मधील

Chandrashekhar Bawankule : मुद्रांक शुल्क घोटाळ्यावर सरकारचा मोठा दणका; राज्यभरातील ५ वर्षांच्या प्रकरणांची विशेष चौकशी

हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  अधिकाऱ्यांसाठी नवी नियमावली;

Job fraud in Kharghar : परदेशी नोकरीचे आमिष पडले महागात; खारघरमधील कंपनीने १.७३ कोटी उकळले!

नवी मुंबई : परदेशात जाऊन शिपिंग कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुणांची नवी मुंबईतील खारघरमध्ये

Navi Mumbai : नवी मुंबई हादरली! खारघरमध्ये महामार्गालगत महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला; पोलिसांकडून कसून तपास सुरु

नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना उघडकीस आली आहे. शनिवारी मुंबई-पुणे