नवी मुंबईत ‘भगत’ कुटुंबातील उमेदवारीवरून वाद

नवी मुंबईत ‘भगत’कुटुंबातील उमेदवारीवरून वाद


नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. एकाच घरातील व्यक्तींना तीन ते चार, तर काही ठिकाणी चार ते पाच जागांची उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संघाशी संबंधित नेत्यांनी केला आहे.


निवडणुकांचे बिगूल वाजले असून काही पक्षांनी उमेदवार निश्चित करून प्रचारालाही सुरुवात केली आहे. नवी मुंबईत भाजपच्या अंतर्गत गोटात उमेदवारीवरून अस्वस्थता वाढताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक १८ मध्ये एकाच कुटुंबाला एकापेक्षा अधिक तिकीट देण्याच्या हालचालींमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.


यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना एका भाजप पदाधिकाऱ्याने सांगितले की, “२०१४ नंतर देशातील राजकीय वातावरण बदलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचे विचार देशभर पोहोचले. भाजपचे कार्यकर्ते तन-मन-धन अर्पण करून काम करतात. सहा वर्षांत पक्षात प्रवेश केलेल्या काही व्यक्ती चार-चार तिकिटांची मागणी करत आहेत.” या पदाधिकाऱ्यांनी पुढे आरोप केला की, “अयोध्येत राम मंदिर उद्घाटन, कलम ३७० हटविणे, पंतप्रधानांचा वाढदिवस आणि १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविले जाणारे सेवा कार्यक्रम – या कोणत्याही उपक्रमांत संबंधित मंडळींचा सहभाग दिसून आला नाही. पक्षाचे नाव वापरायचे, मात्र पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहायचे.


कार्यकर्त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की प्रभाग क्रमांक १८ मधील दशरथ भगत यांना एकापेक्षा जास्त तिकीट देऊ नये आणि निष्ठावंत, सातत्याने काम करणाऱ्यांना संधी द्यावी. २०१९ मध्ये दशरथ भगत, निशांत भगत आणि संदीप भगत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांच्या बॅनरवर कमळाचे चिन्ह, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा स्थानिक आमदारांचे फोटो लावले नसल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे. पक्षाने योग्य आणि न्याय्य निर्णय घेतला तर उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही मेहनत करू, मात्र तसे न झाल्यास “आम्हाला आमचा मार्ग वेगळा घ्यावा लागेल”, असा सूचक इशाराही काही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Ahmedabad Bullet Train : बुलेट ट्रेनच्या कामाला वेग! २१ किमीच्या भुयारी मार्गासाठी घणसोलीत दुसरं महाकाय 'TBM' कटरहेड सज्ज

नवी मुंबई : भारताचे स्वप्न असलेल्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाने आता अधिक गती घेतली आहे.

Monsoon Fishing Ban : मत्स्यप्रजननासाठी राज्याच्या सागरी हद्दीत १ जूनपासून यांत्रिक मासेमारीला बंदी; नियम मोडल्यास होणार कडक कारवाई

नवी मुंबई : पावसाळा तोंडावर आला असून, सागरी जीवांच्या प्रजननासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि मत्स्यसंपदेचे

NMMC Declares 504 Buildings Dangerous : नवी मुंबईत ५०४ इमारती 'धोकादायक' घोषित; ५२ अतिधोकादायक इमारती तत्काळ रिकाम्या करण्याचे महापालिकेचे आदेश!

नवी मुंबई : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) संभाव्य दुर्घटना आणि

APMC Market : कलिंगड खाल्ल्याने मृत्यूच्या घटनेचा फटका; वाशी APMC मध्ये कलिंगड विक्री ठप्प! व्यापारी आणि शेतकरी चिंतेत

नवी मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची

मोठी बातमी: विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, महत्त्वाचे कारण समोर

Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीचे वारे जोरदार रंगात असताना मोठी बातमी समोर आली आहे.

Shivsena : शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार जाहीर; बच्चू कडूंसह नीलम गोऱ्हे अर्ज भरणार

Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान