सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विजयचा शेवटचा चित्रपट ‘जाना नायकन’ असून तो ९ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. २७ डिसेंबर रोजी मलेशियामध्ये झालेल्या या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात विजय भावूक झाला आणि हा त्याचा शेवटचा चित्रपट असल्याचं त्याने स्पष्ट केलं.


अभिनयाला रामराम करत विजयने आता पूर्णपणे राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी त्याने ‘तमिलागा वेट्टी कझगम’ या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी तो करत आहे.


राजकारणात प्रवेशाबाबत बोलताना विजय म्हणाला, “माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे. लोक मला पाहण्यासाठी थिएटरबाहेर रांगेत उभे राहतात. म्हणूनच पुढील ३० ते ३३ वर्षे मी त्यांच्यासाठी रांगेत उभा राहण्यास तयार आहे.” तो पुढे म्हणाला, “चित्रपटसृष्टीत आलो तेव्हा वाळूचा किल्ला बांधण्याचं स्वप्न होतं, पण चाहत्यांनी मला राजवाडा दिला.”


एच. विनोद दिग्दर्शित ‘जाना नायकन’ चित्रपटात बॉबी देओल, पूजा हेगडे, ममिता बैजू, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज आणि प्रियामणी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. थलापतीने ‘मास्टर’, ‘लिओ’, ‘मर्सल’, ‘थेरी’, ‘बिस्ट’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांतून चाहत्यांच्या मनावर कायमच नाव कोरल आहे.

Comments
Add Comment

युरोपमध्ये रंगणार मराठी नाट्यकलेचा जागर

मुंबई : मराठी रंगभूमी ही महाराष्ट्रातील नाट्यपरंपरेचा अत्यंत समृद्ध आणि महत्त्वाचा भाग आहे. भारतातील सर्वांत

राहुल भट्ट यांनी धुरंधर स्टार रणवीर सिंगची केली स्तुती; सांगितले तो इतर बॉलिवूड स्टार्सपेक्षा कसा वेगळा आहे

मोठा स्टार, पण अजिबात अहंकार नाही; रणवीर सिंगबद्दल राहुल भट्ट यांचे मोठे विधान ‘धुरंधर’चा स्टार रणवीर सिंग

प्रेम, विरह आणि शुद्ध भावनांचा संगम! ‘दो दीवाने शहर में’मधील नवे गाणे ‘वजह बेवजह’ प्रदर्शित

मुंबई :  झी स्टुडिओज आणि भन्साळी प्रॉडक्शन्स यांच्या आगामी ‘दो दीवाने शहर में’ या चित्रपटाने आपल्या वेगळ्या आणि

री-रिलीजपूर्वी सलमान खानची जुनी मुलाखत व्हायरल; ‘तेरे नाम’च्या यशामागचं रहस्य उघड

“मी काहीच केलं नाही…” — ‘तेरे नाम’च्या यशावर सलमान खानचं मोठं विधान व्हायरल मुंबई : सलमान खानची कल्ट क्लासिक

रिलेशनशिपबाबत रिंकू राजगुरूचा स्पष्ट दृष्टिकोन; म्हणाली “मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही

मुंबई : ‘सैराट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या तिच्या आगामी

शुभारंभ शुभदिनी, नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

मुंबई : सर्जनशील मनं एकत्र आली की कलाकृतीला नवी उंची मिळते… आणि असाच एक सुंदर योग आता मराठी मनोरंजन विश्वात घडतोय!