२० जानेवारीपासून नितीन नवीन भाजपचे अध्यक्ष

नवी दिल्ली : नितीन नवीन यांना भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची घोषणा २० जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. नवीन यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ जानेवारी २०२६ ते जानेवारी २०२९ पर्यंत राहील. २०२९ मध्ये लोकसभा निवडणुका प्रस्तावित असल्याने त्यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो.


भाजप देशभरातील प्रदेशाध्यक्षांना १५ जानेवारीनंतर दिल्लीला बोलावण्याची तयारी करत आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया १८ ते २० जानेवारी दरम्यान पूर्ण होण्याची शक्यता आहे. पक्षाने शासित राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये पूर्ण झाली आहे. ३७ पैकी २९ राज्यांमध्ये अंतर्गत निवडणुकांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या राज्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन नवीन यांच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्जांचा एक संच सादर करतील. नवीन यांच्या समर्थनार्थ दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांवर पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्याही स्वाक्षऱ्या असतील.


नितीन नवीन हे एकमेव उमेदवार म्हणून अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने, भाजपचे मुख्य निवडणूक अधिकारी के. लक्ष्मण उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीची औपचारिक घोषणा करू शकतात. बिहार सरकारमधील मंत्री नितीन नवीन यांना १४ डिसेंबर रोजी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते.

Comments
Add Comment

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू