बदलापूरमध्ये बिबट्याची दहशत ;लोकवस्तीत घुसून बिबट्याचा हल्ला

ठाणे : दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. बिबट्या वनक्षेत्र सोडून वारंवार मानवीवस्तीत प्रवेश करत आहे. गावातच नाही तर शहरातही बिबट्याची दहशत वाढली आहे. शहरात देखील बिबट्याचा वावर वाढला आहे. ठाण्यासह कल्याण , मुरबाड आणि बदलापूर या शहरात बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना रात्रीअपरात्री बाहेर पडणे कठीण झाले आहे. बदलापूरच्या आंबेशिव, कारवापाठोपाठ आता वांगणी गावात बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण आहे.


बदलापूरमधील वांगणी (काराव) भागात बिबट्याची दहशत वाढली आहे. शिवाजीनगर जुना भेंडी पाडा परिसरातील लोकवस्तीत घुसून बिबट्याने दोन कुत्र्यांची शिकार केली. भर लोकवस्तीत घुसून बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागरिक चिंतेत आहेत. बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केल्याचे समजताच वन विभागाचे पथक वांगणी गावात दाखल झाले. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


स्थानिकांना एक मादी बिबट्या आणि तिच्यासोबत दोन बछडे दिसले. ढोके, दापिवली, पिंपकोळी येथे तसेच वारली पाड्यातील परिसरात शुक्रवारी बिबट्या दिसला. त्यामुळे या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.ठाणे वनविभागाने तीन ट्रॅप आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही हा बिबट्या अद्याप अडकलेला नाही. वनविभागाकडून त्याचा शोध सुरू आहे .

नागरिकांसाठी सूचना:




  • रात्रीच्या वेळी जंगलाजवळ किंवा दाट झाडीच्या परिसरात जाणे टाळा.

  • पाळीव प्राण्यांची काळजी घ्या आणि त्यांना घराबाहेर एकटे सोडू नका.

  • बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभाग किंवा स्थानिक पोलिसांना माहिती द्या.


बिबट्या दिसल्यास काय काळजी घ्यावी ? :




  1. शांत राहा: घाबरू नका आणि पळू नका, कारण बिबट्या वेगाने पळतो.

  2. मोठे दिसा: हात वर करा, मोठा आवाज करा, काठी किंवा टॉर्चचा वापर करा.

  3. हळू हळू मागे सरका: पाठ दाखवू नका आणि हळू हळू मागे फिरा.

  4. वनविभागाला कळवा: त्वरित 1926 वर फोन करून माहिती द्या.

  5. गर्दी करू नका: बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी करू नका.

Comments
Add Comment

मार्चमध्ये युपीआयमधून नागरिकांनी केले कोटींचे व्यवहार; युपीआय ठरतोय वरदान

मुंबई : भारताने सुरु केलेली यूपीआय ही डिजिटल प्रणाली आज जगभर पोहोचली आहे. हातात कॅश नसेल तर आता घाबरून न जात आपण

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात PSI गोपाळ बदनेला जामीन

कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी मागील पाच महिन्यांपासून तुरुंगात

गुड फ्रायडे निमित्त आज शेअर बाजार बंद; सोमवारी पुन्हा व्यवहार होतील सुरू

नवी दिल्ली : गुड फ्रायडे निमित्त आज देशांतर्गत शेअर बाजार बंद आहे. साप्ताहिक सुट्टीमुळे या शनिवार आणि रविवारीही

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करा, भारताची मागणी

ब्रिटनने बोलावलेल्या 60 देशांच्या बैठकीत मांडले मत नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या