श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय


तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या विजयामुळे भारताने मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. चौथ्या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने वीस षटकांत दोन बाद २२१ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला वीस षटकांत सहा बाद १९१ धावा एवढीच मजला मारता आली. भारताने सामना ३० धावांनी जिंकला.


भारताच्या महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना आठ विकेट राखून तर दुसरा सामना सात विकेट राखून जिंकला. हे दोन्ही सामने विशाखापट्टमण येथे झाले. यानंतर पुढील दोन सामने तिरुवनंतपुरम येथे झाले. भारताने तिसरा सामना आठ विकेट राखून तर चौथा सामना ३० धावांनी जिंकला. आता शेवटचा सामना मंगळवार ३० डिसेंबर २०२५ रोजी तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे.


श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून स्मृती मानधनाने ४८ चेंडूत ८० धावा केल्या तर शफाली वर्माने ४६ चेंडूत ७९ धावा केल्या. रिषा घोषने १६ चेंडूत नाबाद ४० तर हरमनप्रीत कौरने दहा चेंडूत नाबाद १६ धावा केल्या. श्रीलंकेकडून मालशा शेहानीने स्मृतीला तर निमाशा मदुशानीने शफालीला बाद केले.


धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेकडून हसिनी परेराने ३३, चामरी अथापथ्थुने ५२, इमेशा दुलानीने २९ (धावचीत), हर्षिता समरविक्रमने २०, कविशा दिलहारीने १३, नीलक्षीका सिल्वाने नाबाद २३, रश्मिका सेववंडीने पाच आणि कौशानी नुथ्यांगनाने नाबाद पाच धावांचे योगदान दिले. भारताकडून वैष्णवी शर्मा आणि अरुंधती रेड्डीने प्रत्येकी दोन तर श्री चरणीने एक विकेट घेतली.


Comments
Add Comment

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना

द. आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेचा