युवा विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ आणि त्यापूर्वी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी युवा भारतीय ब्रिगेडची घोषणा केली आहे. या संघ निवडीत मुंबईच्या आयुष म्हात्रेची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान झिम्बाब्वे आणि नामिबिया मध्ये होणाऱ्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी आयुष म्हात्रे भारताचे नेतृत्व करेल. विहान मल्होत्राची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. आयुषने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीचे फळ त्याला कर्णधारपदाच्या रूपाने मिळाले आहे.

विश्वचषकापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असून तिथे तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. या दौऱ्यासाठी बिहारच्या वैभव सूर्यवंशीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा दुखापतीमुळे या दौऱ्यात उपलब्ध नसल्याने वैभवला ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

...असा आहे भारतीय संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टिरक्षक), हरवंश सिंग (यष्टिरक्षक), आर. एस. अम्रिश, कनिष्क चौहान, खिलान ए. पटेल, मोहम्मद इनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन.

विश्वचषकाचे वेळापत्रक :
यजमान : झिम्बाब्वे आणि नामिबिया
कालावधी : १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६
Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या